Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 28, 2010

ऋतुचर्या

वेगवेगळ्या ऋतुमध्ये करावयाचे आचरण/आहार विहारादि कर्म ही ऋतुचर्या होय. भारतात वेगवेगळ्या ऋतुत वेगवेगळे वातावरण राहते. त्याला अनुसरुन आहार विहार योग्य ठेवल्यास शारीरिक त्रास / रोग होत नाहीत. शरीर,मन सुद्रुढ् राहते.सर्व कर्म योग्य तर्‍हेनी करता येतात.आजारी होउन मग औषध घेण्यापेक्षा ऋतुचर्येचे पालन करुन रोगमुक्त राहणे केव्हाही चांगले.
वर्षाचे(year) साधारणतः दोन भाग पडतात.उत्तरायण व दक्षिणायन. उत्तरयणात रात्र लहान व दिवस मोठा असतो.त्यामुळे सुर्याच्या प्रखर किरणांमुळे जीवसृष्टीमधील शक्तिचे शोषण होते.याविरुद्ध परिस्थिती दक्षिणायनात असल्यामुळे प्राणीमात्रांचे पोषणाचे काम या काळात होत असते.या अयनांचे(अयन=सुर्य)-उत्तरायण व दक्षिणायन-तीन उपविभाग होतात, ज्याला ऋतु म्हणतात.उत्तरायण -शिशिर,वसंत,व ग्रिष्म आणी दक्षिणायन-पावसाळा,शरद व हेमंत या प्रकारे ते ऋतु होत. आयुर्वेदातील दोषसंचय,प्रकोप व उपशमनासाठी याच सहा ऋतुंना मान्यता आहे. ऋतुसंधीकाल म्हणजे प्रत्येक ऋतु संपण्याचा शेवटला पंधरवाडा व नविन ऋतुचा पहिला पंधरवाडा असा सुमारे महिन्याचा काळ.

वसंत

चैत्र व वैशाख महिने - या वेळेस वातावरण प्रसन्न असते. थंड व सुगंधीत हवा वाहत असते.पुर्वीच्या, शिशिर ऋतुतिल गोड व स्निग्ध आहारामुळे श्लेष्माचा शरीरात संचय होउन या ऋतुत सुर्याचे तापामुळे तो पातळ होतो व जठराग्नी कमी(मंद) करतो.अतः कफशामक औषधे घेउन त्याचे शमन करावे.वसंत ऋतुत भ्रमण हितकारक आहे.वमन,व्यायाम,कडू व तिखट रसांचे सेवन चांगले. गोड, आंबट व पचावयास जड पदार्थ, थंड पदार्थ, दही इ. टाळावे.

ग्रिष्म (उन्हाळा)

ज्येष्ठ व आषाढ महिने - वातावरण उष्ण होत जाते.त्यामुळे प्राणीमात्रांचे बल व आर्द्रतेचा नाश होतो. जलाशयांचे पाणीपण सुकत जाते.म्हणुन शरीरातिल कफ पण कमी होतो.त्याने वायु वाढतो.त्यामुळे गोड, मधुररसयुक्त,शीतल,सुपाच्य,रसयुक्त(काकडी,टरबुज)फळे,गोड थंड पेय,दही, ताक इ. चे सेवन करावे.थंड्या पाण्याने आंघोळ,दिवसा झोप हितकारक आहे. अत्याधिक मिठाचे पदार्थ,कडू पदार्थ,अति व्यायाम,उपास,उन्हात पायी चालणे,पचावयास जड जेवण हानीकारक आहे.

पावसाळा

श्रावण,भाद्रपद - या वेळेस पाणी दुषित असते.वायु बाष्पयुक्त(humid)असतो.त्याने जठराग्नी मंद होतो.उन्हाळ्यात शरीरात जमा वायु कोपतो.वातावरणातील थंडाव्यामुळे कफ पण वाढतो.पाण्यातील अम्लता वाढल्यामुळे पित्तप्रकोप पण होतो.त्यामुळेच या दिवसात शरीर जास्त रोगग्रस्त होते.पाणी उकळुन प्यायला हवे.जास्त पावसाचे वेळी आंबट,खारट,व स्निग्ध पदार्थ खायला हवे.दिवसा झोप,जास्त परिश्रम,रुक्ष पदार्थ सेवन करु नये.

शरद ऋतु

महिने-आश्विन,कार्तिक - हा ऋतु स्वास्थ्याच्या द्रुष्टीने उत्तम आहे.पावसाळ्यात वाढलेले पित्त सुर्यकिरणांमुळे कुप्त होते.दुध-साखर,आंवळा,गोड,तिखट व कडु रसयुक्त पदार्थ,मनुका इ. सेवन चांगले. गुळ,लसुण इ. पित्तकारक पदार्थ त्याज्य करावे.ताक,दही,वांगे,क्रोध दिवसा झोप त्याज्य.

हेमंत ऋतु

मार्गशिर्ष व पौष मास - या दिवसात वातावरण थंड राहते.रात्र मोठी होते तर दिवस लहान.थंडीमुळे शरीराची रोम छिद्रे आकुंचन पावतात.याचा परीणाम म्हणुन शरिरात उष्णता वाढते. या काळात, भुक लागुन जेवण न मिळाल्यास हा वाढलेला अग्नी शरीरबलाचा नाश करतो.म्हणुन,या ऋतुत,मधुर,स्निग्ध,अम्ल व लवणयुक्त(खारट)पदार्थ,दुध वा दुधापासुन केलेले पदार्थांचे सेवन करणे उचित. सकाळी लवकर भोजन,ताजे व गरम अन्न,शरीरची मॉलिश,शरीर उष्ण ठेवणे,कठोर श्रम इ. करावे.कडु,तिखट,कोरडे अन्न,केळे, आलु,त्याज्य आहेत.

शिशिर ऋतु

माघ व फाल्गुन महिने -या ऋतुची लक्षणे व चर्या साधारणतः हेमंत ऋतुसारखीच असते.अती थंड वातावरणामुळे कफाचे प्रमाण वाढते. गरम पाणी पिणे,चांगले तुपयुक्त जेवण,खिचडी इ.चे सेवन करावे.हेमंत ऋतुत त्याज्य पदार्थ येथेही लागु आहेत.
चांगल्या आरोग्यासाठी ही ऋतुचर्या पाळणे हितावहच आहे. ऋतुसंधीकालात संपुर्ण कुटुंबासाठी कुटुंब काढ्याचे सेवन पथ्थ्यकारक(हितकारक) आहे.

No comments:

Post a Comment

Visit Our Page