Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 31, 2011

॥ शंख भस्म ॥

शंख भस्म( १-३ गुंजा )

प्रकार ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो...     (र.चं)

ग्राह्य ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो शुभेतरः ।
अशुद्धो गुणदो नैव शुद्धश्च स गुणप्रदः ॥

दक्षिणावर्त शंख शुभ असतो.
अशुद्ध     अग्राह्य
शुद्ध     ग्राह्य

शंखशुद्धी ?
=>
अम्लैः सकांजिकैः च एव दोला स्विन्नः स शुद्धति ॥    (र.चं)

अम्लैः     =    निम्बूरस,इ.
कांजि    =    कांजी
दोला    =    दोलायंत्र
स्विन्न    =    शिजवणे
किती वेळ ?    =    १ प्रहर

शंखभस्म निर्माण ?
=>
१.    वन्हौ प्रोत्फुल्लयेत्‌
किंवा
२.    सम्यक्‌ लघुपुटे पचेत्‌ ।

शुद्ध शंख भस्म स्वरुप ?
=>
कुन्दवत्‌ जायते भस्म    सर्वरोगेषु योजयेत्‌ ।

==========================================॥

वृद्ध वैद्याधार से शंख भस्म निर्माण की कृती =>

दक्षिणावर्ती शंख ले । यह शुभ होता है ।
इस शंख के टुकडे कर ले ।
निम्बु रस में इन टुकडो को २४ घण्टे भिगोके रखे ।
स्वच्छ जल से प्रक्षालन कर ले ।
धूप में सुखोए ।
मृत्तीकापात्र में रख मातकापड कर गजपुट दे ।
स्वांगशीत होने दे ।
उस में कुमारी स्वरस डाल अच्छी तरह मिश्रण करे ।
धूप में सुखोए ।
सुखने पर फिर से गजपुट दे ।
इससे संगजिरे जैसा श्वेतवर्णी एवं सूक्ष्म मृदुस्पर्शी शंख भस्म प्राप्त होता है ।
==========================================॥

ग्रंथोक्त गुणधर्म=>

शंखक्षारो हिमो ग्राही ग्रहणारेकनाशनः ।
नेत्रपुष्पहरो वर्ण्यः तारुण्यपिटिकाप्रणुत्‌ ।
दक्षिणावर्तशंखस्तु त्रिदोषघ्नः शुचिर्निधिः ॥
ग्रह-अलक्ष्मी-क्षय-क्ष्वेडम्‌-अतिक्कक्षयाक्षमीः ।
(यो.र.)

==========================================॥

शंखभस्म यह शंख क्षार ही है ।

क्षार के काफी सारे गुणधर्म इस में आयें है ।
शंखभस्म  एवं कपर्दिक भस्म इनमें काफी गुणसादृश्यता है ।
दोनोही सेंद्रिय चुनखडीके कल्प है ।
पर इन्हमें शंख के कुछ विशेष गुण भी है । उनका उल्लेख आगे किया जायेगा ।

शंख भस्म ग्राही है । यह स्तंभन करता है । इसलिये अतीसार विशेषतः पक्वातीसार में उपयुक्त होता है ।
ग्रहणी व्याधी में बार बार द्रवरेच होते हो तो विशेष उपयुक्त ।
[ सशूल (कोष्ठशूल) सद्रव अल्पाल्प मल प्रवृत्ती ] यह उत्तम अवस्था है शंख भस्म के उपयोग के लिये ।

शंखोदर योग = { शंखभस्म + टंकण भस्म + अफू + जायफळ } = पक्वातीसार का योग ।

पित्तज कोष्ठशूल
पित्तज अतीसार
कफ-पित्तज कोष्ठशूल

विष्टब्ध/विदग्ध अजीर्ण

लक्षणानि    =>
    आध्मान
    आनाह
    शूल    =    तडक निघाल्याप्रमाणे वाटते.
    कोष्ठ स्तैमित्य    =    अन्न स्थिर पडल्याप्रमाणे वाटते
    विदग्ध उद्गार    =    करपट ढेकर
    मधुर उद्गार    =    गोड ढेकर

शंखभस्मस्य कार्य  
चिकित्सा तत्व    =>    उदर आध्मान नाश
                             अन्न पाचन वृद्धी
                             उदरस्थ वात शमन

अपक्ति जन्य उदरशूल
    स्थान        दोष    चिकित्सा अनुपान
१.    आमाशय    =>    पित्तज    => @ गोघृत
२.    पक्वाशय    =>    वातज    => @ निम्बु स्वरस

रसाजीर्ण / रसशेषाजीर्ण !

अनार्ह     =>    पित्त प्रकृती रुग्ण !

यकृत-प्लिहा दुष्टी समुत्पन्न विकार     =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।

यकृत्‌-प्लिहा वृद्धि        =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।
+ मलावष्टम्भ            =>    + विरेचक औषध देणे.

उदरस्थ गुल्म
अष्ठीला    

कालज अतीसार
विषूचिका
जंतुज विषूचिका (कॉलरा)        प्रारंभिक तीव्र वेग उपशमानंतर वापर उपशयकारक.
लक्षणानि    =>    द्रवरेच , छर्दी उपशय
        अल्प द्रवरेच + दौर्बल्य
चिकित्सा    =>    शंखभस्म + माक्षिक भस्म

नेत्र फूल पडणे    =>    रोपणधर्मी म्हणून उपयुक्त.

तारुण्यपीटिका    =>    उत्तम औषध.

दोषघ्नता    =>    पित्त
दूष्य    =>    रस रक्त अस्थिअ
स्थान गामित्व    =>    यकृत्‌ प्लिहा उदुंक ग्रहणी पक्वाशय नेत्र मुख

संदर्भ आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र भाग १ ते ५

http://www.facebook.com/waghmare.prashant
वैद्य प्र. प्र. व्याघ्रसूदन

  • 9867888265




Sunday, October 30, 2011

उतारवयात अनुभवा कामजीवन!

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं.

... 

साठीकडे झुकल्यावर माणसाची कामातुरता कमी होते, हा एक सर्रास गैरसमज आहे. अमेरिकेत एकदा ५० ते ९२ वयोगटातील ४३४६ स्त्री-पुरुषांचं सवेर्क्षण घेण्यात आलं होतं. तेव्हा, साठी-सत्तरीतल्या वृद्धांनी स्पष्ट कबुली दिली होती की, त्यांचं कामजीवन सुरळीत चालू असून, त्यात त्यांना खूप रस वाटतो. ही सगळी शिकली सवरलेली मध्यमवगीर्य मंडळी होती. खरंतर वृद्धापकाळातही कामजीवन आपणास साथ देतं, हे वास्तव तरुण मंडळींनाही उत्साहवर्धक वाटणारं आहे. या सवेर्क्षणात, अडतीस वर्षं संसार केलेली बाई म्हणाली होती, 'माझा नवरा बाहेरून परत येणार असतो, तेव्हा मी त्याची आतुरतेनं वाट पाहत बसते. फोनवर त्याचा आवाज ऐकला किंवा त्याने घातलेली शीळ ऐकली की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.'

सदुसष्ट वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्ही प्रेमात पडलो अन् सरत्या काळात आमचं प्रेम वाढत गेलं. अजूनही आमच्या प्रेमाचा आलेख वर वर चढतोय.' आणि त्या सर्व प्रौढ दाम्पत्यांनी आपल्या संसारसुखाचं श्ाेय त्यांच्या निरामय कामजीवनास दिलं होतं.

वाढत्या वयानुसार माणसाच्या जिभेची चव, श्रवणशक्ती, दृष्टी, शारीरिक ताकद कमी होते, त्या प्रमाणे कामातुरतेवरही परिणाम होत असतो. शिवाय हृदयविकार, मधुमेहासारखे आजार त्यांच्या कामजीवनात अडथळे बनतात. पण या आजारांमुळे कामशक्ती ऱ्हास पावते असं मात्र मुळीच नाही.

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं. नियमित वीर्यपात होणाऱ्या पुरुषांचा मूत्रनलिकेतील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगापासून बचाव होतो. कामसुखामुळे वयोवृद्धांच्या शरीरातील रक्तदाबावर अनुकूल परिणाम होतो. शरीराचे मांसल स्नायू कार्यरत राहतात. संप्रेरकाचं सवण नियंत्रित राहतं आणि शरीरातील विविध ग्रंथींची पुनर्रचना होण्यास मदत होते.

इंग्लंडमधील रॉयल एडिनबर्ग इस्पितळातील डॉ. डेव्हिड क्लिस यांनी १९ ते १०२ वयोगटातील ३५०० जणांचं शास्त्रोक्त सवेर्क्षण केलं होतं. तेव्हा त्यांना आढळलं होतं की आठवड्यातून तीनदा समागम करणारी मंडळी कामसुखापासून वंचित होणाऱ्या मंडळींपेक्षा तुलनेने १० वर्षांनी तरुण दिसतात. तारुण्याच्या टिकाऊपणासाठी आनुवंशिकता केवळ २५ टक्के कारणीभूत असते, बाकी सर्व त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आणि वागणुकीवर अवलंबून असतं. कामसौख्यामुळे प्रौढांच्या मनावरचा ताण सैल होण्यास मदत होते. तसंच इण्डोफिर्नसारखी वेदनाशमक जीवरसायनं शरीरात निर्माण होतात. याशिवाय, कामसुख लुटताना शरीरात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिटोसिन या रसायनामुळे पती-पत्नीतील एकोप्याची भावना वाढते आणि जोडप्यात सुसंवाद होऊन त्यांच्यातील जीवनबंध घट्ट होत असतात.

अलीकडेच, स्वित्झर्लण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्यांच्या सवेर्क्षणात, पुन्हा एकदा, म्हाताऱ्या मंडळींमध्ये वाढणाऱ्या कामातुरतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अन् साठीनंतरचा काम ही काही पाश्चिमात्य लोकांची मक्तेदारी नाही, हे आपल्याकडील डॉक्टरमंडळींच्याही ध्यानी आता आलं आहे. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली कामशक्ती लय पावणार नाही ना, या शंकेने त्रस्त झालेले हृद्रोगी आहेत. म्हातारपणी होणाऱ्या पाकिर्न्सन आजारात खाल्लेल्या औषधांमुळे कामवासना वाढलेल्या आजीबाईही आहेत. इतकंच काय, हृदयाचा झटका आला तरी बेलाशक पण व्हाएग्रा वापरून लिंग ताठरता प्राप्त करून घेणाऱ्या आजोबांची उदाहरणंही आहेत.

आयुष्यातील मध्यमवयात खाणंपिणं भरपूर वाढलेलं असतं आणि थकवा येणं ही परिस्थिती बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असते. स्पर्धामय जीवनात सामाजिक, आथिर्क स्तर उंचावण्याच्या धडपडीत आपण नकळत आरोग्याला गहाण टाकत जातो आणि लैंगिक जीवनाच्या सुदृढतेवरही मोठा आघात करत असतो. सर्वसाधारण: आपल्याकडील समाजात लग्न झालं, मुलंबाळं झाली की सर्व संपलं असा समज करून स्त्रिया आपलं जीवन आचरण सुरू करतात. त्यांचा वस्त्रप्रावरणांबद्दलचा नीटनेटकेपणा हरवतो. शरीराच्या आकारमानावरील ताबा सुटतो. या आणि अशा दुर्लक्षित बाबींमुळे पती-पत्नीतील आकर्षण कमी होऊ शकतं. हे आकर्षण जपून ठेवणं म्हणजे 'निज शैशवा'स जपून ठेवण्यासारखं आहे. शिवाय, शक्य तेवढं वाचन करून ज्ञानवृद्धी करणं, आपल्यातील कलागुणांचा विकास करणं यांसारख्या गोष्टींद्वारे पतीपत्नीने वैचारिकदृष्ट्या जवळीक साधली तर त्यांच्यातील आकर्षण सतत वाढीस लागतं. त्यामुळे उतरत्या वयातील कामजीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो, हे सांगणे न लगेच. 





जोसेफ तुस्कानो 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3319369.cms

आहारातून अतिसेवन

चुकून जमिनीवर सांडलेले तेल /तूप साफ करायला वेळ व श्रम बरेच लागतात आणि एवढे करूनही ते व्यवस्थित साफ होत नाही. तुमच्या आहारातील तेल/ तूपाबाबत सुद्धा हे खरे आहे.
स्निग्धघटकातून भरपूर उष्मांक ( कॅलरीज) निर्माण होतात. आहारात जर स्निग्धघटकांचे अतिसेवन असेल तर शरीराला लागणा-या उष्मांकापेक्षा कितीतरी जास्त उष्मांक शरीरात निर्माण होतात. हे जास्तीचे उष्मांक मग शरीरात वेगवेगळ्या भागात साठवले जातात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात यावर शरीरात स्निग्धघटक साठण्याचे प्रमाण व जागा अवलंबून असतात.

स्त्रीच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त स्निग्धघटके साठतात आणि हे एकदम नैसर्गिक आहे. युवा पुरुषांच्या शरीरातील स्निग्धांशाचे प्रमाण त्याच्या वजनाच्या साधारण १०-१५ टक्के असते तर युवा स्त्रीमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे तिच्या वजनाच्या २० -३० टक्के असणे हे एकदम नैसर्गिक आहे. संततीचे प्रजनन व संगोपन करणे हे स्त्रीचे नैसर्गिक काम आहे. या काळात जर तिला अन्नाची कमतरता झाली तर शरीरात साठलेल्या अतिरीक्त स्निग्धांशाच्या मदतीने शरीराची गरज भागवता यावी यासाठी निसर्गाने केलेली ती सोय आहे. त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन काळात “ झीरो फिगर” चा अट्टाहास हा घातक होऊ शकतो. 
शरीरात साठलेल्या या अतिरीक्त स्निग्धांशामुळे नुसते तुमचे शरीर बेडौल दिसत नाही तर तुमच्या हृदयावरही कामाचा ताण वाढतो. ५०० ग्रॅम अतिरीक्त स्निग्धांशे तुमच्या हृदयाला ३०० किलोमीटर लांबीइतक्या जास्तीच्या रक्तवाहिण्यांमधून रक्त पाठविण्याचे अतिरीक्त काम व ताण देतात.
दुसरा तोटा म्हणजे हे सगळे स्निग्धांश रक्तातून वहात असताना ते तुमच्या रक्तवाहिण्यांच्या भिंतीवरही साठत जाऊन रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण करतात. यामुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन गंभीर स्वरुपाचा हृदयविकारा होऊ शकतो.
शरीरात स्निग्धघटक साठले आहेत किंवा नाही हे पाहण्य़ाची एक सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कमरेचा घेर व दंडाची जाडी.
या दोन ठिकाणी तुम्ही हाताचा अंगठा व तर्जनी यांच्या चिमटीत जास्तीत जास्त स्नायु पकडण्याचा प्रयत्न करा. दोन सेंटीमिटरपेक्षा जास्त जाडी जर तुम्ही तुमच्या चिमटीत पकडू शकला तर याचा अर्थ तुम्ही चिमटीत पकडलेला हा भाग शिथिल स्नायु नसून कातडीखाली साठलेली चरबी आहे . म्हणजेच तुमच्या शरीरात आधीच जास्त स्निग्धघटक साठलेले आहेत व इथून पुढे स्निग्धघटकांच्या सेवनावर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
ही कसोटी सर्वांना लागू होते मग तुमचे लिंग, वय काहीही असो. तुम्ही ही सोपी कसोटी करून पहा व तुम्हीच ठरवा तुम्ही लठ्ठ आहात किंवा नाही.
एकदा हे झाले की मग आहारातून किती स्निग्धघटक घ्यायचे हे ठरवा व त्यावर काळजीपुर्वक लक्ष ठेवा. 
तुमच्या आहारातील सर्वसाधारण अन्नप्रकारातील स्निग्धघटकांचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे. त्यावरून तुमच्या आहारात सध्या किती स्निग्धघटक आहेत व किती घ्यायला हवेत याचा तुम्हाला अंदाज घेता येईल. हे प्रमाण एका वेळच्या खाण्यातील आहे.

अन्नप्रकार ( १०० ग्रॅम)स्निग्धांशाचे प्रमाण ( ग्रॅम)
उकडलेले किंवा भाजलेले बटाटे०.१
स्निग्धांशविरहीत दुधापासून बनविलेले दही०.३
वरीलप्रमाणेच बनविलेले ब्रेडस्प्रेड४.०
लोणी८.०
चपाती१०.०
मिल्कशेक१०.०
मलई१३.०
चॉकलेटची छोटी वडी१५.०
चीझ बर्गर१५.०
कठीण पनीर१९.०
भाजलेल्या मांसाचा तुकडा२०.०
कबाब किंवा सॉसेज२१.०
सामोसा२६.०

वरील तक्त्यावरून तुमच्या रोजच्या सर्वसाधारण आहारात असलेल्या एकावेळच्या खाण्यातील स्निग्धांशाचे प्रमाण समजते.
तुमची स्निग्धतेची रोजची गरज आहे ६५ ते ८५ ग्रॅम या दरम्यान. समजा तुम्ही एकदोन सामोसे व छोटा चॉकलेटचा बार खाल्लात तरी तुमची स्निग्धघटकाची रोजची गरज पूर्ण होते. म्हणजेच तुमचे रोजचे दोनवेळचे जेवण व इतर खाणे यातून मिळालेले स्निग्धघटक हे अतिरीक्त होतील व शरीरात साठून राहतील.

आहारातील स्निग्धघटकांचे प्रमाण तुम्ही कसे कमी कराल?
वरील कसोटीप्रमाणे तुमच्या शरीरात स्निग्धघटक साठून राहिले असतील तर प्रथम रोजच्या आहारातून तुमच्या शरीरात किती स्निग्धघटक जातात याचा वरील तक्त्यावरून तुम्ही अंदाज घ्या.
आता तुम्हाला स्निग्धघटकांचे आहारातील प्रमाण कमी करावे लागेल. हे कसे कराल?
प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारातून तेल/ तेल वा तत्सम स्निग्धघटक पूर्णत: बंद करणे आरोग्याला हानीकारक अहे आणि मुख्य म्हणजे तसे करण्याची गरजही नाही. आणि रोजचे दोनवेळचे जेवण कमी करण्याचीही गरज नाही. फक्त काही पथ्ये पाळा.
रोज शक्यतो घरचेच जेवण घ्या. कमी स्निग्धता असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवा. म्हणजेच चपाती किंवा पराठा याऐवजी पुलकी खा. त्याला वरून तूप लावू नका. भाजलेले वा उकडलेले पदार्थ जास्त खा. नाश्त्याच्या वेळी तुम्ही पावावर लोणी लावीत असाल तर पुढच्यावेळेपासून त्यावर लोण्याचा पातळ थर द्या. उपहारगृहात खावेच लागले तर तळलेल्या सामोसे / वडे सारख्या पदार्थापेक्षा उकडलेल्या इडलीला प्राधान्य द्या. चीझ सॅन्डवीचपेक्षा व्हेज सॅन्डवीच खा. भाजलेले वा उकडलेले पदार्थ खा.
रोज एक ग्लास दूध पित असाल तर दुधातील स्निग्धांशाबद्दल तुम्हास माहीत असणे आवश्यक आहे.
मलईयुक्त पूर्ण दूध : २२.० ग्रॅम,
अर्धे स्निग्धांशयुक्त दूध : ११.० ग्रॅम
स्निग्धांश काढलेले दूध : १ ग्रॅम
तुमच्या शरीरातील स्निग्धांशाच्या प्रमाणाप्रमाणे यापैकी कोणते दूध घ्यायचे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जाडे नसाल व तुमचा आहार संतुलीत आहे आणि आहारात तेलही प्रमाणातच आहे तर तुम्ही अर्धे स्निग्धांश युक्त दूध ( ५०%) वापरू शकता.
तुमच्या आहारात तळलेले पदार्थ असतील, भातावर व पोळीवर तूप घेत असाल तर मात्र तुम्हाला स्निग्धांशविरहीत ( स्कीम्ड) दूधच घ्यावे लागेल.




http://knowaboutyourfood.blogspot.com/

पानगळ आणि चैत्रपालवी


सातत्याने परिवर्तन हा  निसर्ग नियम आहे. शिशिर ऋतूत निसर्गात जे बदल होतात त्याचे परिणामस्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची होत असलेली पानगळ  आपण दरवर्षी बघतो. त्यापाठोपाठ वसंत ऋतू सुरु झाला कि निसर्ग पुन्हा एकदा बदलतो आणि त्याचे परिणामस्वरूप झाडांना आलेली नवीन चैत्रपालवी सुद्धा आपण दरवर्षी बघतो. निसर्ग ऋतुचक्र दरवर्षी याप्रकारे कार्यरत असते. शिशिर ऋतू आल्यावर झाडांची जुनी पाने कोणतीही खळखळ न करता त्या त्या झाडापासून वेगळी होतात आणि नवीन येणाऱ्या चैत्र पालवीला जागा करून देतात.
आम्हाला असलेला अनुभव नवीन येणाऱ्या पानाना नाही असे जुनी पाने म्हणत नाही. आम्ही नसलो तर झाडाचे कार्य व्यवस्थित चालणार नाही अशा गमजा ती जुनी पाने करत नाहीत. चैत्र महिन्यात येणारी नवीन पालवी कोणताही अनुभव गाठीशी नसताना जुन्या पानांची कमतरता भासू न देता नवीन जोमाने त्या झाडाची कार्ये पूर्वी सारखीच पूर्ण करतात.
प्रत्यक्ष जीवनात मात्र हे चित्र सहसा दिसत नाही. घराघरातील वयोवृध्द स्वखुशीने तरुणांच्या हातात संसाराची सूत्रे सोपवताना फार कवचित दिसतात. आम्ही गेली कैक वर्षे जसे करत आलो आहोत तसेच पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा हेका कमी होताना दिसत नाही. एकंदर आयुष्मान वाढत चालले आहे त्यामुळे ज्या घरात ७५-८० चे वयोवृध्द आहेत त्या घरात ५० च्या जवळपास असणाऱ्या त्यांच्या पुढील पीढीला स्वतंत्र पाने संसार करता येत नाही आणि त्यांच्या मनातील स्वतंत्र संसारच्या कल्पना पूर्ण झालेल्या नसतानाच त्यापुढील पीढी सुद्धा त्यांच्या मनासारखे करता येत नाही म्हणून चीचीद करताना दिसते.
जी गोष्ट घरात तीच गोष्ट बाहेरील कार्य क्षेत्रात दिसून येते. व्यवसाय क्षेत्र असो किवा राजकारण असो वायोवृधानी  आपले अधिकार स्वताहून पुढील पिढीच्या हाती सोपवले आहेत हे दृश्य काहुपाच तुरळकपणे पाहण्यास मिळते.
कोणत्याही गोष्टीचा मोह ठेऊ नये अशी अध्यात्माच्या नावाने सकाळ संध्यकाळ पोपटपंची करणारी मंडळी सुद्धा याला अपवाद दिसत नाहीत.
स्वताचे अधिकार स्वताहून सोडणे हे आपण पानगळ ते चैत्र पालवी या अविरत चालणाऱ्या निसर्ग दृश्यातून कधी शिकणार आहोत का ?               

Vasant Chintaman Joshi



  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104

  • 9323406386


Monday, October 24, 2011

स्वतःला उटणे लावणे

स्वतःला उटणे लावणे
१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.

२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. या भागात सुप्त असणार्‍या त्रासदायक लहरींचे वहन दोन्ही बाजूंनी होत असल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण करून त्यांच्यातील त्रासदायक स्पंदनांना नष्ट करावे.

३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.

४. नाक : उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे आणि खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
६. गालांच्या पोकळी : यांत केंद्रबिंदूशी अनेक टाकाऊ वायू घनीभूत झालेले असल्याने उटणे गालाला लावतांना गालाच्या मध्यभागातून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. यामुळे गालातील मध्यपोकळीत घनीभूत झालेली त्रासदायक स्पंदने कार्यरत होऊन त्यांचे विघटन त्याच जागी होण्यास साहाय्य होते.

७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हालवून उटणे लावावे.

८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.

९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे

१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. यामुळे चक्रे जागृत होतात. त्यानंतर दोन्ही हातांची बोटे छातीच्या मध्यरेषेशी येतील अशा पद्धतीने दोन्ही हात वरून खाली एकाच वेळी फिरवावेत.

११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला आणि चार बोटे दुसर्‍या बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.

१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.

१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा आणि तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.

१४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

१. पाठ : दुसर्‍या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.

२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.



http://www.facebook.com/pappukaka5

Tuesday, October 4, 2011

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते.
उपासना मार्गावर, भक्ती मार्गावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी प्रथम आपल्या जन्म नक्षत्राची जी देवता आहे त्या देवतेचे स्मरण प्रथम करणे आवश्यक आहे. इतर देवतेपर्यंत पोचण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्र असलेल्या देवतेला बायपास करू नये. आपल्या आर्ध्य वृक्षाचे चित्र जरी आपल्या नित्य वावर असलेल्या जागी ठेवले तरी ते लाभदायक ठरते..
शरदिनी डहाणूकर यांच्या नक्षत्रवृक्ष या पुस्तकात प्रत्येक वृक्षाचे रंगीत चित्र आहे व अधिक माहितीसुद्धा आहे.
खाली दिलेले टेबल दाते पंचांगकर्ते यांच्या नक्षत्र: देवता आणि वृक्ष मधून संकलित केले आहे.      
नक्षत्र                            देवता               आराध्यवृक्ष
आश्विनी                    अश्विनीकुमार             कुंचला
भरणी                         यम                          आवळ
कृत्तिका                       अग्नी                        उंबर
रोहिणी                         ब्रम्हा                      जांभळी
 मृग                            चंद्र                          खैर
आर्द्रा                           शंकर                         कृष्णागरु
पुनर्वसू                         अदिती                      वळू
पुष्य                             बृहस्पती                  पिंपळ
आश्लेषा                         सर्प                         नागचाफा
मघा                             पितर                          वट
पूर्वा                              भग                         पळस
उत्तरा                             अर्यमा                    पायरी
हस्त                             सूर्य/सविता                जाई
चित्रा                            त्वष्टा                        बेल
स्वाती                          वायू                        अर्जुन
विशाखा                         इंद्राग्नी                    नागकेशर
अनुराधा                       मित्र                         नागचाफा
ज्येष्ठा                           इंद्र                           सांबर
मूळ                               निरुती                     राळ
पूर्वाषाढा                        उदक/आप              वेत
उत्तराषाढा                      विश्वेदेव                    फणस
श्रवण                           विष्णू                       रुई
धनिष्ठा                           वसू/गंधर्व                शमी
शततारका                     वरुण                      कळंब
पूर्वाभाद्रपदा                   अजैकपाद               आम्र
उत्तराभाद्रपदा                  अहिर्बुध्य                कडूलिंब
रेवती                              पूषा                       मोह
  



http://www.facebook.com/vasantcjoshi
Vasant Chintaman Joshi

  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104
  • 9323406386


Wednesday, September 14, 2011

श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !


श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !

सणवार साजरे करणे यासारखा आनंद मनुष्याला इअतर कशात मिळत असेल असे मला वाटत नाही. वर्षभर आपण कोणते ना कोणते सण, उत्सव साजरे करीतच असतो. मात्र चातुर्मास म्हणजे या सगळ्या सणवारांचा राजा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चातुर्मासाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळागौर, नागपंचमी,नारळी पौर्णिमा, गणपती, नवरात्र, दसरा, द्वाळी असे अनेक सण, उत्सव याच काळात साजरे होतात. असे असले तरी या चार महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचे महत्व जरा अधिकच आहे.
      धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीला होतो. या एकादशीलाच “शयनी एकादशी” असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णु शयन करतात, झोपी जातात आणि कार्तिकी / प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात अशी समजुत आहे. जेव्हा देव झोपलेले असतात त्या काळात असुरांचे, राक्षसांचे बळ वाढलेले असते. सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरलेले असते. अशावेळी मनुष्याने या असुरांपासुन स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. हे राक्षस, असुर म्हणजे कोणी प्राणीमात्र आहेत असे समजण्याऐवजी काम, क्रोध, लोभ, द्वेष, असुया , मत्सर यासारखे षड्-रिपु म्हणजेच असुर होय असे मला वाटते. आयुर्वेदानुसार सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज व तम हे मनाचे दोष आहेत. यापैकी रज व तम वाढले की काम-क्रोध आदी भाव मनात वाढीस लागतात. थोडक्यात कामक्रोधादी भावांचा नाश करण्यासाठी मनाचा सत्व गुण वाढविणे हा योग्य उपाय आहे. म्हणुनच चातुर्मासात किंवा श्रावणात यम, नियम, आहाराविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथांचे पठण, तुलसीपूजन, दानधर्म, उपवास, लंघन, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणा-या गोष्टींचा अवलंब करणे फायद्याचे ठरते यात शंका नाही.
      ज्याप्रमाणे आपले वागणे आपल्या मनावर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे आपला आहारदेखिल मनावर प्रभाव करीत असतो आणि मनाचा आहारावर प्रभाव पडत असतो. उदाहरणासाठी आपल्याला सांगता येईल कि नासके, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण करते आणि परिक्षेच्या काळात मनावर आलेल ताण भूक कमी करतो, अपचन-अजीर्ण-अम्लपित्त यासारखे त्रास निर्माण करतो. थोडक्यात अन आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. जर या काळात पथ्य पाळले नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होतो आणि मनालाही त्याचा त्रास होतो.
      चातुर्मास आणि त्यातही श्रावण म्हणजे नुसती उपास-तापासांची रेलचेल असते. खरंतर मूळ शब्द “उपास” हा नसून तो आहे “उपवास”. त्या शब्दाची फोड होते उप + वास. “उप” म्ह्णजे जवळ आणि “वास” म्हणजे राहणे. “देवाच्या जवळ राहणे” असा लाक्षणिक अर्थ उपवास या शब्दातून व्यक्त होतो आणि नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नाही तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित आहे. व्यवस्थित खाऊन-पिऊन देवाची पूजा अचना करायला मन तयार होणार नाही. उपवासाला भरपूर खाल्लेल्या खाण्याने आलेले आळस , सुस्ती हे मनाला आणि शरीराला स्वस्थता लाभू देणार नाहीत आणि म्हणुनच उपवासाने पूर्ण लंघन, एकभूक्त किंवा लघ्वशन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रत्ययास येते. उपवासाला चालणा-या पदार्थांची यादी पाहिली कि ज्यांनी या गोष्टी उपवासाला चालतात असे ठरविले त्यांचे खूप कौतुक (?) वाटते. हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीत बसतात. उपवासाला आणि चातुर्मासात चालणारे आणि न चालणारे पदार्थ म्हणजे भगर, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा, बटाटा, रताळी, दही, ताक, कांदा आणि लसुण असे आहेत. यातील कांदा आणि लसुण सोडून इतर सगळे पदार्थ उपवासाला चालत असले तरी त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर आपण आपलेच ठरवायचे की त्यांचे सेवन उपवासाला करायचे कि नाही ?

१)     भगर – भगरीलाच वरी असेही नाव आहे. बहुधा जेथे नाचणी पिकते तिथेच भगरही पिकते. याचा भात, लाट्या, पीठ तयार करून वापर केला जातो. वरी गोड, तुरट रसाची असून वृष्य (मैथुनक्षमता वाढविणारी ) आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा नाश करणारी असल्याने थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
२)     साबुदाणा – एका प्रकारच्या स्टार्चपासूनहा पदार्थ बनविला जातो. ताडासारख्या जातीच्या वृक्षापासून हा तयार होतो. खिचडी किंवा तळलेला वडा या स्वरूपात हा पचायला अतिशय जड असणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे उपवासाला अजिबात खाऊ नये. अगदिच खायचाच असेल तर दुधात बनविलेली खीर बरी. पण आव, अपचन, भूक नसणे यात या कडे बघूही नये. मुळात ज्यांना साबुदाणा खुप आवडतो त्यांनी एकदा साबुदाण्याच्या कंपनीला भेट द्यावी. नंतर साबुदाणा खायची इच्छा मरते हे मात्र नक्की.
३)     शिंगाडा – पाण्यात तयार होणारी ही वेल आहे. याची फळे आपण वापरतो. शिंगाडा गोड रसाचा, थंड गुणाचा, पचायला जड, पित्त-रक्तविकार,दाह यांचा नाशक आहे. बळ देणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा तहान, जुलाब, संग्रहणी, गर्भस्त्राव यात उपयुक्त असला तरी कमी मात्रेत खाण्यास योग्य आहे.
४)     राजगिरा – पुरुषभर उंचीचे हे झुडुप असते. याची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये पुष्कळ पौष्टीक गुण आहेत. लघवीला साफ करणार आणि रक्तातील दोष दूर करणारा राजगिरा मूळव्याधीतही फायद्याचा आहे. पचायला हलका असल्याने सर्व उपवासाला चालणा-या पदार्थांमध्ये याचा नंबर एक लागतो.
५)     बटाटा व रताळी – कंदमूळ या प्रकारात मोडणारे हे दोन्ही पदार्थ गोड रसाचे, थंड, पचायला जड, बळ वाढविणारे आहेत. कच्चा बटाटा दाह करणारा आणि कैफ आणणारा आहे. मात्र उकडल्यावर हे दोष कमी होतात ( नष्ट नाही. ). मधुमेही, संग्रहणी, जुलाब व पोटात मुरडा येणा-या रोग्यांनी बटाटा टाळावा. आग होणे, लघवीच्या तक्रारीत रताळी उपयुक्त आहे. पण हे दोन्ही पदार्थ तारतम्याने खावे.
६)     दही आणि ताक – दही हे उष्ण ( थंड अजिबात नाही ) , बूक वाढविणारे, पचायला जड, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, पित्त-रक्तविकार-सूज-मेद-कफ वाढविणारे आहे. त्यामुळे उपवासाला इतर पदार्थ पचन बिघडविणारे असतांना त्यात भरीसभर म्हणुन दही अजिबात खाऊ नये. मात्र दह्यात चारपट पाणी टाकुन, रवीने घुसळुन लोणी काढलेले ताक मात्र ह्या पृथ्वीवरचे अमृत आहे. ताक हे तुरट गोड रसाचे, पचल्यावर गोड होणारे, पचायला हलके, उष्ण, तृप्ती देणारे आणि वातनाशक आहे. म्हणुन उपवासाला दह्यापेक्षा ताक चांगले. मात्र अंगाची आग, रक्तपित्त, चक्कर येणे यात ताक टाळावे.
७)     कांदा आणि लसुण – वर आपण उपवासाला आणि चातुर्मासात चालाणा-या (?) पदार्थांची माहिती पाहिली. पण कांदा आणि लसुण हे न चालणरे पदार्थ आहे. कांदा हा भरपूर औषधी गुणयुक्त असला तरी तो रज आणि तम दोष वाढविणारा आहे तसेच तो अमेध्य (बुध्दीला उपयुक्त नसणारा) आहे. त्यामुळे चातुर्मासात किंवा श्रावणात जेव्हा मनाचा सत्व गुण वाढणे अपेक्षित आहे तेव्हा कांदा त्याला मारक ठरतो कारण तो रजोतमोवर्धक आहे. राहू चोरून अमृत प्यायला, त्यामुळे त्याचा गळा कापतांना जे अमृताचे थेंब खाली पृथ्वीवर पडले त्यातुन लसुणाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. थोडक्यात असुरांपासुन लसणाची उत्पत्ते झाली आहे त्यामुळे तो याकाळात वर्ज्य आहे. अन्यथा लसुणामध्ये औषधी गुण ठासून भरलेले आहेत.
उपवासाला चालणारे पदार्थ, त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर “एकादशी अन दुप्पट खाशी” ही म्हण खोटी पाडली पाहिजे असे वाटते. कारण आपण फक्त उपवासाला भरपूर खातो आणि इतर वेळी मात्र फार पथ्याने राहतो अशी परिस्थीती नाही. आणि म्हणुनच इतर काळात केलेल्या अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास हा कडकडीत करून पचनशक्तीला  काम करायला अवसर दिला पाहिजे तर तो उपवास आपल्याला लाभेल.
      लंघनाने होणारे फायदे वाचले तर तुम्हीही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्याल यात शंका नाही.
“विमलेन्द्रियता सर्गो मलानां लाघवं रुचिः ।
क्षुत्तृट्सहोदयः शुध्दहृदयोद्गारकण्ठता ॥
व्याधीमर्दवमुत्साहः तन्द्रानाश्चलंघिते ॥“ ( अष्टांग हृदय/सुत्र/१४)
थोडक्यात सर्व इंद्रिये (कर्मेन्द्रिय,ज्ञानेन्द्रिय,मन) प्रसन्न होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, अंगाला हलकेपणा येणे, रुची उत्पन्न होणे, भूक आणि तहान यांचा एकाचवेळी योग्य प्रादुर्भाव होणे, हृदय आणि कंठ शुध्द होणे, शुध्द ढेकर येणे ( कडवट-आंबट ढेकर नसणे), शारीरिक रोगांचा जोर कमी होणे, उत्साह वाढणे आणि झापड- तंद्रा कमी होणे हे सगळे फायदे लंघनाने होतात.
      हे सगळे पाळले गेले तर आपल्या पूर्वीच्या आचार्यांना उपवासाने अपेक्षित असलेले ध्येय आपण गाठू शकू, नाही का ?


                                                                 वैद्य . मनीष जोशी,
७, गुंजाळ एव्हेन्यु, महिला बँकमागे,
इंदिरानगर,
नाशिक – ४२२००९
फोन – ९४२०४६२०५ / ९८८११५०२७२


॥ एकांगवीर रस ॥

॥ एकांगवीर रस ॥

शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ।
ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥
सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
वराव्योषकनिर्गुण्डीवन्हिकार्द्रकजैः द्रवैः ॥
शिग्रुकुष्टद्रवेणापि ततो धात्र्या द्रवेण च ।
विषमुष्ट्यार्कहाटैःश्च आर्द्रकस्य रसैस्तथा ॥
रसश्चैकांगवीरोsसौ सुसिद्धो रसराड्‌ भवेत्‌ ।

पक्षघातं चार्दितं च धनुर्वातं तथैव च ॥
अर्ध्दांगं गृध्रसीं वापि विश्वाचीमपबाहुकम्‌ ।
सर्वान्वातामयान्हन्ति सत्यं सत्यं न संशयः ॥

भारत भैषज्य रत्नाकर
प्रथम खण्ड
एकारादि-रस
पृष्ठ क्र॰ १९५
पाठ क्र॰ ५८५

मूळ पाठ
वृद्ध निघण्टुरत्नाकर॰ वातव्याधीचिकित्साप्रकरणम्‌
================================॥
मूळ पाठ

सर्व आर्ष ग्रंथांत 'एकांगवीर रस' ,
सर्वप्रथम वृद्ध निघण्टु रत्नाकर मध्ये लिखित स्वरुपात दिसतो.

भारत भैषज्य रत्नाकर पाहिल्यास
इतर कोणत्याही ग्रंथात हा पाठ नसल्याचे दिसते.

एक पाठ असल्याने विशेषशुद्धी किंवा पाठ विनिश्चयाची विशेषत्वाने
गरज नाही.

तरीही वृद्धवैद्यक परंपरेत काय सांगितले आहे हे जाणून घेणे ही
आवश्यक आहे.

त्यासाठी, उपलब्ध ग्रंथसंपदेतील, "आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" ह्या
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं"च्या चिकित्सानुभव व
औषधी कल्पांचे सुस्पष्ट आयुर्वेद-शास्रीय विवेचन वाचनाचाच मार्ग
आद्य व अग्र्य ठरतो.

१.    शुद्धगन्धं    =    शुद्ध गंधक
२.    मृतं सूतं     =    मारीत पारद
३.    कांतं     =    कान्त लौह भस्म
४.    वंगं च     =     वंग भस्म
५.    नागकम्‌ ।    =    नाग भस्म
६.    ताम्रं     =    ताम्र भस्म
७.    चाभ्रं मृतं     =    अभ्रक भस्म
८.    तीक्ष्णं     =    तीक्ष्ण लौह भस्म
९.    नागरं     =    सुंठ
१०.    मरिचं     =    मिरे
११.    कणा ॥    =    पिप्पली
सर्वमेकत्र संचूर्ण्यं ,
भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
१.    वरा        =    त्रिफळा क्वाथ  
२.    व्योषक        =    त्रिकटु क्वाथ  
३.    निर्गुण्डी        =    निर्गुडी क्वाथ
४.    वन्हि        =    चित्रक क्वाथ
५.    शुद्धार्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    शुद्ध आल्याचा स्वरस
६.    शिग्रु        =    शेवगा त्वक् क्वाथ
७.    कुष्टद्रवेणापि ततो     =    कोष्ठ क्वाथ
८.    धात्र्या द्रवेण च ।    =    धात्री क्वाथ
९.    विषमुष्टी        =    कुचलाबीज क्वाथ
१०.    अर्क        =    रुई मूळ क्वाथ
११.    हाटैःश्च         =    कांडवेल क्वाथ
१२.    आर्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    आल्याचा स्वरस *

मात्रा     =    १/२ ते १ गुंज      
    =    ६० mg to १२० mg

काल    =    स, व्यानोदान /  व्यानोदान / अपानौ

फलश्रुती    =  
१.    पक्षाघातं
२.    अर्दितं
३.    अनुर्वातं
४.    अर्धाड्गं
५.    गृध्रसीं
६.    विश्वाची
७.    अवबाहुकम्‌
८.    सर्वान्वातामयान्‌
॥ =============॥ पक्षाघाते एकांगवीर रसः ॥ ===============॥
पक्षाघात अथवा अर्धांगवायु => (कोणाला होतो ?)
हा विकार १. त्रासिक, चिडखोर, संतापी

२. ज्यांच्या रक्तवाहिन्या उपदंशादिक विकारांच्यामुळे विकृत झालेल्या असतात,
अश्या माणसांना होतो.
 पक्षाघाताची सम्प्राप्ति कशी घडते ??=================>>
मनाच्याविरुद्ध काही गोष्टी झाल्यामुळे
असल्या तिडतिड्या माणसात
एकाएकी संताप येऊन
एकदम सर्व शरीरभर खळबळ उडून जाते,
त्यामुळे =>
१ } विकृत झालेल्या रक्तवाहिन्यांत रक्तसंचय जास्त होऊन
त्याचा दाब हा मेंदू व वातवाहि केंद्रे ह्यांवर होऊन
पक्षाघात उत्पन्न होतो;

किंवा

२} रक्तवाहिनी फुटून तिच्यातून रक्तस्राव होऊ लागतो.
आणि
रुधिराचा साठा...
ज्ञानकेंद्राच्या बाजूला झाल्यामुळे
त्या माणसाची जाणीवनेणीव नष्ट होते,
किंवा
थोड्या अंशाने कमी होते.
शरीरातीळ संचालनक्रियेवर त्याचा ताबा रहात नाही.
स्नायुंच्यामुळे शरीरातील चलनवलनादि व्यापार सुरु असतात.
स्नायुंवरचा ताबा कमी झाल्यामुळे
ते व्यापार होईनासे होऊन
रोगी विगलित झाल्यासारखा होतो,
चलनवलनादिकाच्या कार्यास विरोध येतो,व्यत्यय येतो
म्ह्णून
आयुर्वेदात त्याची गणना "वातविकृतीत" केली आहे.

ह्या आजारात साधारणतः
अवस्थाभेदाने दोन तर्‍हेची चिकित्सा करता येते.
अ ] तीव्र अवस्थेत
रक्तवाहिनी फुटून रक्ताचा स्राव झालेला असतो,
त्याचे
१ .प्रसादन करणे
२. फुटलेल्या रक्तवाहिनीचे घटक नवीन तयार होऊन
ती सांधली जाऊल अशी तजवीज करणे,
आणि

ब ] जुनाट अवस्थेत
रक्तवाहिनी फुगण्याची अथवा फुटण्याची शरीरास लागलेलि सवय नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या इकडे रक्तप्रसादन करणारी जी औषधे आहेत;
त्यात =>
१. ताप्यादि लौह
२. स्वर्णमाक्षिक भस्म
३. शिलाजतु
४. गुग्गुल
ही मुख्य आहेत.
याच्या योगाने रक्ताचे प्रसादन होऊन फुटलेली रक्तवाहिनी सांधते.
रक्तवाहिनी सांधली गेली म्हणजे थोडा कालपर्यंत बरे वाटते.
परंतु पुनः पूर्ववत्‌ कारण घडल्यास रोग्यास पुनः पक्षाघाताचा झटका येतो.
म्हणून रक्तवाहिन्यांना जडलेली ही सवय नाहीशी करणारे असे एखादे औषध या

जुनाट अवस्थेत देणे जरुर असते.
आयुर्वेदाच्या उपपत्तीप्रमाणे रक्ताचे वहनकार्य वायूच्या प्रेरकत्वामुळे घडून येत असते.
वाताच उद्रेक जास्त झाला म्हणजे रक्ताचे उद्वहन कार्यही जास्त वेगाने होते.
रक्तवाहिनीची फुटण्याची सवय नाहीशी करावयाची असल्यास
रक्ताचे उद्वहनकार्य बेतावर आणने जरुर असते.
हे कार्य एकांगवीराच्या योगाने चांगल्या प्रकारे घडून येते. ॥ =============॥ अर्दिते धनुर्वाते अर्धाड्गे एकांगवीर रसः ॥ ===============॥

पक्षाघात हा केवळ शरीराच्या अर्ध्या भागालाच होतो असे नाही,
तर कित्येक वेळेला
फक्त
एका हाताला
किंवा
एका पायाला
किंवा
कमरेच्या खालील भागाला
किंवा
तोंडाच्या एका बाजूला
अशा प्रकाराने
निरनिराळे पक्षाघात होतात.

ह्या सर्व ठिकाणी विशिष्ट स्नायूंची चलनवलनादि शक्ति कमी झालेली असते.
ह्या सर्व प्रकारात
एकांगवीर रस निरनिराळ्या अनुपानांबरोबर द्यावा.

धनुर्वाताच्या विकारात शरीराच्या कोणत्या तरी भागात अभिघातजन्य
किंवा
इतर अशी जखम झालेली असते
आणि ती जखम व्रणचिकित्सेच्या अनुरोधाने नीट चिकित्सित न झाल्यास आणि

दूषित झाल्यास त्या जखमेतून धनुर्वाताचे विवक्षित जंतू शरीरात प्रविष्ट होऊन

वातप्रकोपास निमित्तकारण होतात,
वातदोष स्नायू, व शिरा यात प्रकुपित होऊन सर्व शरीराला धनुष्याप्रमाणे वाकवितो,
आणि म्हणूनच यास धनुर्वात म्हणतात.
यालाच अपतानक, आयाम इत्यादि संज्ञा लक्षानुरोधे प्राप्त झालेल्या आहेत.

ह्या रोगाच्या प्रथमावस्थेत=>मोठ मोठाले झटके येऊन सर्वांग वाकते,
दाभाड बसते,
मनुष्यास शुद्धि असते,
परंतु गिळण्याची सोय असत नाही,
ह्या अवस्थेत ==>>"कालकूट रसा"<<== चा चांगला उपयोग होतो.
परंतु
दवीतीयावस्थेत =>तीव्रावस्था नाहीशी झाल्यानंतर, सर्वांगास एक प्रकारचा लुळेपणा आलेला असल्यास व स्नायूंची शक्ति क्षीण झाल्यासारखी असल्यास
==>>"एकांगवीरा"चा<<== त्यानंतर उपयोग होतो. ॥ ==========॥गृध्रसीं / विश्वाचीम्‌ / अपबाहुके एकांगवीर रसः ॥==========॥

कुल्ल्यापासून प्रारंभ होऊन
कंबर => मांड्या => गुडघे => जांघाडे व पायापर्यंत
वारंवार चमका निघतात.
सगळा पाय ताठल्यासारखा होतो.
पाय लुळा पडल्या सारखा होतो.
अति तीव्र वेदना कित्येक वेळेला होतात.
सुयांनी टोचल्यासारखे होते.
पण जागच्या जागी जखडल्यासारखा होतो
आणि
जरा वेळ पाय उभा केला,
की वारंवार त्यात स्पंद उत्पन्न होतात.
ह्या विकारास गृध्रसी अशी संज्ञा आहे.
गृध्रसीत वातप्रधान लक्षणे असता एकांगवीर द्यावा.

हाताच्या बोटांपासून वेदना सारख्या चढत चढत जाऊन हात अगदी भारावून जातात. बोटांनी काही काम होऊ शकत नाही यत्किंचित उचलले किंवा काही धरले, की सर्व बोटांतून सारख्या मुंग्या येऊन धरलेला जिन्नस पडून जातो, व तो केव्हा पडला ही जाणीव रहात नाही. या अवस्थेत एकांगवीर चांगला उपयोग होतो.

एकांगवीरात
कांत-वंग-नाग -ताम्र-अभ्रक-तीक्ष्णलोह ही बॄंहण, जीवन व रसायन औषधे आहेत.
वातरोगांत बृंहण हेच शमन असते. या न्यायाने ही वातशामक औषधे आहेत.

पारद कज्जली - रसायन, योगवाही  व जंतुघ्न अशी आहे.
भावना = वातप्रशमन करणार्‍याच औषधांच्याच आहेत.
हे औषध अत्यंत तीक्ष्ण आहे.
त्यामुळे त्याचा उपयोग वातप्रधान कीवा कफप्रधान विकारांत करावा.
पित्तानुबंध सता उपयोग करणे इष्ट नसते.
संदर्भ ग्रंथ = 
"आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" By
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Wednesday, June 29, 2011

मासिक पाळी

मासिक पाळी नेहमी अनियमितच येते, कधी दर महिनाआड येते; तसं होणं हा आजार आहे का? आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का..?

        हल्ली सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या आहे. मासिक पाळी उशीरा येणे, दर महिना आड येणे किवा दोन दोन महिन्यांनी येणे अशी अनियमितता मुलींमधे सर्रास आढळते. त्याला वैद्यकीय परिभाषेत पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणतात. स्त्रीच्या गर्भातशयात बीज परिपक्व झालं आणि त्यादरम्यान त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही तर ते परिपक्व झालेलं बीज गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येतं. मात्र अनेक मुलींच्या शरीरात ही प्रक्रिया पूर्णच होत नाही. एकाचवेळी अनेक बीजं परिपक्व व्हायला लागतात. त्यातून एकही बीज पूर्ण परिपक्व होत नाही आणि तसे न झाल्याने ते गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येत नाही. त्यामुळे मासिक पाळी सुरू होत नाही. एकच बीज परिपक्व व्हायला वेळ लागतो तसतशी मासिक पाळी उशीरा आणि अनियमित होऊ लागते.

या अनियमिततेची कारणं काय..?

मुलींची सध्याची बदललेली लाईफस्टाईल हे मुख्यत: या समस्येचे कारण आहे. सतत बाहेरचं खाणं, पोषक नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश मुलींमधे ही समस्या उदभवते. पुर्वी मुली घरात काम करत असत, शरीराला त्यातून चलनवलन, व्यायाम होत असे. आता घरकाम अतिशय कमी झालं, पायी चालणंही बंद त्यामुळे शरीराची हालचालच कमी होते. पोटाला तर अजिबातच व्यायाम मिळत नाही.
हे सारं एका दिवसात घडतं असं अजिबात नाही. दोन-चार वर्षे हे सतत असंच घडत राहतं आणि त्यातून मासिक पाळी अनियमित होण्याची तक्रार सुरू होते.

या समस्येवर उपाय काय..?

      आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा या समस्येवरचा पहिला उपाय. मात्र सतत मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या आहारात तातडीने बदल करावा वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी. हॉटेलमधले खाणे, फास्ट फूड, खूप तेलकट-तूपकट पदार्थ कमी करावे. रोज वेळा ठरवून पोषक आणि चौरस आहार घ्यावा. पोषक आहाराचा अभाव आणि अशक्तपणा हेदेखील अनियमिततेचं कारण असू शकतं. त्याचबरोबर व्यायाम सुरू करावा. पुर्वी अशी काही समस्या असेल तर बायकांना रोज पिपळाला दहा प्रदक्षिणा घालायला सांगत. त्यामागे अंधश्र्रद्धा नव्हती तर त्या बाईला रोज ठराविक वेळेला ठराविक व्यायाम करायला लागावा, चालणं व्हावं म्हणून खरं तर ती रीत होती. पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार यातून ही अनियमितता दूर करता येऊ शकते.
      मात्र हे सारे करत असताना वैद्यकीय सल्ला घ्यावा. जर अनियमिततेची सुरूवात असेल तर ठीक पण तसे नसेल तर औषधोपचारांची गरज पडू शकते. मात्र समस्या मोठी आणि दीर्घकाळ असेल तर मात्र औषधोपचार करावेच लागतात.

पाळी येण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या घेतल्या तर हा प्रश्न सुटू शकतो का..?

       पाळी येण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या म्हणजे काय तर शरीरातील हार्मोन्स वाढवणं. ते वाढले की चक्र सुरळीत होऊन मासिक पाळी येते. पण सतत अशा गोळ्या घेऊन हे चक्र सुरू ठेवण्याचा उपयोग नाही, केवळ पाळी येतेय एवढंच समाधान त्यातून मिळू शकतं. मात्र गर्भाशयात जर स्त्री बीज परिपक्व होण्याचं चक्र सुरळीत होणार नसेल तर त्या व्यवस्थेत झालेला बिघाड दुरुस्त होणार नाही. तो दुरुस्त होण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यक तो औषधोपचारच करून घ्यावा लागेल. तरच ही अनियमितता दूर होऊ शकते.
       तसं पाहता पाळीची अनियमितता ही मुलींमधे सर्रास दिसणारी समस्या आहे; पण त्यावर वेळीच औषधोपचार झाले नाहीत, पाळीचं चक्र सुरळीत सुरू झालं नाही तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतातच. वजन वाढतं, कधीकधी अचानक जास्त वजन वाढतं. अनियमित पाळी येण्याच्या समस्येतून गर्भाशयात गाठी तयार होऊ शकतात. त्यातून भविष्यात गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. मासिक पाळी येणंच अकाली बंद होण्याची समस्याही यातून उदभवू शकते. त्यामुळे मासिक पाळी सतत अनियमित असेल तर वेळीच औषधोपचार करणं आणि त्यापेक्षाही आपल्या जीवनपद्धतीत बदल करणं महत्वाचं.
 
मासीक पाळीत स्वयंपाक का करू दिलं जात नाही?

         मासीक पाळी सुरू असताना स्त्रीयांना सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते. या काळात महिलांना अन्य लोकांपासून वेगळे राहण्याचाही नियम आहे. या दिवसांत महिलांनी अधिक तीव्र वास असलेल्या परफ्युमस वापर करू नये. आजकाल अधिकांश युवा या रुढींना अंधश्रद्धा मानून त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

         परंतु यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, याची फार कमी लोकांना माहिती असते. मासिक पाळी सुरू असतांना महिलांना विविध शरीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. या दिवसांमध्ये महिला इतर वेळेपेक्षा जास्त दुर्बल झालेल्या असतात. महिलांच्या गर्भाशयाचे मुख या काळात उघडे राहते. यामुळे मासीक पाळी सुरू असताना महिलांना विश्रांतीची आवश्यकता असते.

        धर्मशास्त्र सांगतात की मासिक पाळी सुरू असताना एखाद्या महिलेने केलेले स्वयंपाक घरातल्या सर्वांसाठीच हानीकारक असते. यामुळे घराला उतरती कळा लागते. त्यामुळेच महिलांना मासीक पाळी सुरू असताना स्वयंपाक करू दिले जात नाही
.
वैद्य . जितेश पाठक 
धुले
  • 8275007220Mobile
  • 9960507983Mobile
 

महिलांमधील लठ्ठपणा -

भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.

यामागची काही कारणं :

* गरोदार महिलांना गर्भाच्या वाढीसाठी अधिक प्रमाणावर खायला दिलं जातं.

* बाळाला सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे बाळंतपणानंतर स्त्रियांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. गरोदरपणाच्या काळात वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी फारसे प्रयत्न करताना त्या दिसत नाहीत.

* फास्ट फूड आणि स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर.

* पाटीर् किंवा अशाच काही प्रसंगांमध्ये करण्यात येणारं मद्यप्राशन आणि भरमसाठ खाणं.

* पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक तर फळांऐवजी कॅन्ड फ्रुटज्यूस घेतल्यानेही लठ्ठपणा वाढतो.

* नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये तणावाचं प्रमाण अधिक आहे. घरातील आणि कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. लठ्ठपणामुळे महिलांना सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मणक्याचा त्रास अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागते.
.....

उपाय :

* फ्रुटज्यूसपेक्षा फळं खाणं.

* पाटर््यांमध्ये भरपूर कॅलरीज असणारे अन्नपदार्थ टाळायला हवेत.

* बाहेरचे पदार्थ न खाता घरगुती पदार्थ खाण्याचा आग्रह धरा.

* गरोदपणात सकस आहार घ्या. यामध्ये आयर्न, प्रोटिन्स, कॅल्शियम अधिक असावेत.
गोड पदार्थ टाळा.

* लठ्ठपणाची फॅमिलीहिस्ट्री असेल, तर आहारातील तेलाचं प्रमाण कमी करा.

* रोजच्या रोज व्यायाम करायला हवा.

* बॉडी मास इण्डेक्स (बीएमआय) नियमित तपासा.

* वजन कमी करण्याचे शॉर्टकट् हे तात्पुरते असतात. वजन योग्य प्रकारे कमी करायचं, तर डायटिशियन, कौन्सिलर्स, डॉक्टर्स यांच्याकडून सल्ला घ्या.
 
वैद्य . जितेश पाठक 
धुले
  • 8275007220Mobile
  • 9960507983Mobile


Sunday, May 22, 2011

इन्टर्नशिप एक आव्हान..


आशा या वैद्यकीय व्यवसायाची  निवड केल्याचा सार्थ अभिमान बालगत प्रत्येक विद्यार्थी ४ १/२ वर्षा एकाच दिवसाची वाट पाहत असतो ,तो दिवस म्हणजे अंतिम वर्षाच्या निकालाचा . निकालाचा दिवस !! मनात प्रचंड  भीती ,डोक्यावर मणाचे ओजे - पालकांच्या अपेक्षांचे अणि आपन पाहिलेल्या स्वप्नांचे.. वेबसाइट वर बैठक क्रमांक, वर्ष टाकुन जाला की निकल येई परेन्त ४ १/२ सेकंड मधे ४ १/२ वर्ष च कल ज़र्ज़र निघून जातो...वर्गातील पहिलाच दिवस ,रात्र रात्र जागुन केलेला आभ्यास ,dissection  चुकवून पाहिलेला सिनेमा ,चहा ची टपरी, १ अणि २ वर्ष ज़ल्यावर केलेला दंगा, कळत  नकळत निर्माण जालेली नाती अणि रुनानुबंध ....यात वेळ कसा जातो समजतच  नाही अणि १६' स्क्रीन वर आयुष्याचा निकाल लागतो  ,डोळ्यातून एकाच वेळी असू अणि तोंडातून आरोळी बाहेर पड़ते " मी डॉक्टर जालो sssssssss"" याच वेळी  काही मित्रांचा स्वप्नभंग जाला आहे हे पाहून वाईट वाटते  पण मनाच्या  संवेदानावर "डॉक्टर" मात करतो अणि जीना इसीका नाम है बोलून पेढे वाटायला बाहेर पडतो.....
              आनंदी आनंद ,पेढे वाताप ,बक्शिसने खीसे अणि कौतुकाने मन भरल्यावर इन्तेर्न्शिप च्या पहिल्या दिवशी हॉस्पिटल मधे पाउल  पड़ते , सर नि विचारलेले प्रश्न bounsar सारखे जातात ( तिथे no ball denare कोणी नसते अणि अहो त्यावेळी मुन्नी बदनाम जाली होती, शीला  जवान जाली होती त्यामुले वाचायचे राहिले हे सांगायची सोय नसते ) सर आपल्याकडे पाहून कुत्सित हसत असतात अणि त्यातूनच सन्देश मिळतो " बेट्या ,वैद्यकीय व्यवसायात तुजे स्वागत आहे "
                   इन्टर्नशिप ही मुलातच असते ती वैद्यकीय व्यवसायाची ओळख होण्यासाठी ,पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष रुग्नावर वापरण्यासाठी कारण पुस्तकातून ज्ञान घेण सोप असत पण ते  रुग्नावर वापरना कठिन असत अणि "बहुतेक जमेल मला " असा न म्हणता " होय जमते मला " असा आत्मविश्वास डॉक्टर ला देण्यासाठी ,काही शिकायचा राहिला असेल तर ते शिकण्या साठी हे वर्ष असत .....घाना,इंग्लैंड,साउथ अफ्रीका  मधे हा काल २ वर्षाचा,इरान अणि स्वीडन  मधे १८ महीने आहे .
           या  काळात इन्टर्न खुपच विभ्रमावास्थेत असतो ,आधीच कसा बसा पास ज़लेला असतो ,basic clear नसते , pathological reports,ECG,CT,MRI reports ,USG, Xray अजुन नीट समजत नसतात ,एकाच रुग्णत सगळ्याच रोगांची लक्षणे दिसू लागतात ,medicine dose  नीट adjust करायला जमत नसतात ,यामुले एक डोळा davidson वर अणि एक डोळा  CIIMS वर आसतो, या सगळ्यात तो गोंधालुन जातो ..फक्त ज्यानी अधि clinic केले असते त्यांचा मार्ग थोडा सुकर असतो . नकळत होत असलेल्या लहान सहन चूका, अपुरे ज्ञान ,कसा विचारायच  हा न्यूनगंड यामुले आतल्या आत तो अस्वस्थ होत असतो..अणि खरी अस्वस्थता निर्माण होते ती रुग्नाच्या  च्या नजरेने ..प्रतिस्पर्धी संघास विजयासाठी ६ चेंडूत १० धावा हव्या असताना धोनी जेवा मुनाफ / नेहरा कद चेंडू देतो तेवा कोत्यावधि भारतीयांच्या मनात जी भावना येते तीच रुग्णच्या चेहेर्यावर ज़लाकते " आता हा काय करणार ??" रुग्नाची भावना त्याच्या दृष्टीने बरोबर असली तारी या नजरेची सवय नसलेल्या  इन्टर्न च्या अत्मविश्वाचे खच्चीकरण होते अणि असे वारंवार घडले की येते विमनास्कता !!
       या वर्षाच्या काळात एक प्रश्न सताव्तो तो म्हणजे पुढे काय करायच?त्याच्या जोडीला ही विमनास्कता आली की विचार्चाकरे वेगाने फिरू लागतात ..सर्वांची पैसे भरून एम्.डी/ एम्.एस व्हायची आर्थिक ताकद नसते ,तर मेरिट ने व्ह्यायची बौद्धिक ताकद नसते अणि ज़लेच तर रुग्णालय काढणे व चलवाने  सोपे नसते , इतर courses अणि त्यांची उपयुक्तता याची प्रतेकला माहिती असतेच असे नसते त्यामुले अडचणीचा  डोंगर वाढतच जातो .. 
              डॉक्टर जेवा I.P.S/I.A.S होउन देशाचे आव्हान पेल्तात, किंवा "नटसम्राट " होउन कलेचे आव्हान पेलतात तेवा मन अभिमानाने फुलून येते ,पण सग्ल्यानाच हे जमते असे नाही..शैक्षणिक कर्जाचा वाढत जाणारा आकड़ा ,खांद्यावर असणारी जबाबदारी, काही गुंता गुन्तिचे घरघुति प्रश्न अणि त्यामुले आयुष्यात स्थिर व्हयाची गड़बड़ यमुले पिचून एखादा मित्र मला म्हणतो "गड्या बस जाला आता,आपन बर अणि G.P बरी " तेवा मनात कोठेतरी वाईट वाटता ...G.P वाईट नक्कीच नसते पण त्याने पाहिलेली स्वप्न अणि प्रत्यक्ष परिस्थिति यात खुप तफावत असते ..माज्यासारखा वैद्यकीय वारसा असनारा इन्टर्न कदाचित आशा समस्या कधीच समजणार नाहीत कारन शून्यापासून सुरु करणे अणि दहा पासून सुरु करणे यात खुप फरक आहे ...
                               या सगळ्या अव्हानाचा विचार करतानाही हे मन प्रचंड आशावादी असते..कारण आज या व्यवसायात जे निष्णात आहेत ते पण या अवस्थेतून गेले आहेत हे माहित  असते ..प्रकाशाचा वाटा,के.इ.एम् सारखी पुस्तके वाचल्यावर आपल्या समोरचे आव्हान काहीच नाही असे वाटू लागते. माज्या अयुर्वेदास आज राजश्रय मिळत आहे अणि त्याच्या उत्कर्षा साठी परिश्रम करायची तयारी असते ..अशावेळी " चांगले रुग्णालय म्हणजे काय?तर समाजातील दिन दुबल्या ,अनाथना नाथ करणारे, वैद्याकतिल सर्वोत्तम ज्ञान जिथे शिश्योत्तमानना प्रदान केले जाते ,जिथे नवा विचार संशोधनाचे स्फुल्लिंग फुलवतो , जिथे वैद्याकाचे शास्त्र सुश्रुशेच्या कलेशी एकरूप पावते,प्रत्येक  शाखेतील शिक्षकाला जेथून प्रेरणेचा  स्त्रोत मिळतो ,अणि जेथे वैद्यकीय सल्लामसलत ही सदभावना अणि वैचारिक देवानघेवानिच्या भक्कम पायावर उभी असेल अशी गंगोत्री म्हणजे रुग्णालय " हे विल्यम ऑस्लर यांचे शब्द अताव्तात अणि पाय अपोआप रुग्णालय कड़े पडतात ...एक नव्या अव्हानाला सामोरे जायला......
   (वैद्य) अंकुर रविकांत देशपांडे
       B.A.M.S INTERN
          SANGLI 416416
    CELL NO- +91 9175338585
                   

Wednesday, May 18, 2011

आयुर्वेद संशोधन

मतिमंद मुलांसाठी शंखपुष्पीचा वापर लाभदायक
मुंबई - मतिमंद मुलांमधील दोष निवारण करण्यासाठी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये शंखपुष्पी ही अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. महाराष्ट्रातील 100 मतिमंद मुलांची निवड या संशोधन कार्यासाठी झाली असून, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमध्ये शंखपुष्पीचा वापर हा लाभदायक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षांपासून चालू असणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय क्षेत्रामधील आयुर्वेदाचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित होणार असल्याचा विश्‍वास संशोधन संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.

मतिमंद मुले ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास हा उशिरा होतो; तसेच काही मुलांमध्ये शारीरिक वाढीमध्येही मर्यादा आढळून येतात. या मुलांमध्ये हे व्यंग नेमक्‍या कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्यात आनुवांशिकता, रक्तगट, जीवनशैली, तणाव यासारख्या गोष्टींप्रमाणे अन्य कोणत्या बाबी कारणीभूत असतात यांचाही विचार करणे गरजेचे असते. या मुलांमधील न्यून पूर्णपणे संपुष्टात आले नाही तरीही त्यांचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी विशेषत्वाने विचार करण्याची गरज या प्रकल्पामध्ये करण्यात आल्याचे डॉ. कुणाल पाटील सांगतात. याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणून आयुर्वेदिक औषधांबाबतही विविध प्रयोग करण्यात आले. त्यातून शंखपुष्पीचा एका विशिष्ट प्रमाणात या मुलांमध्ये केलेला वापर हा सकारात्मक परिणाम देतो, असे संशोधनांती सिद्ध झाले. यासाठी निवड करण्यात आलेल्या या मुलांचा वयोगट चार वर्षांपेक्षा कमी असावा, जन्मानंतर आवश्‍यक त्या सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात आलेले असावे, डोक्‍याला अथवा मेंदूला कोणत्याही प्रकारची दुखापत यापूर्वी झालेली नाही हेदेखील यात कटाक्षाने पाहण्यात आले आहे. तसेच या मुलांच्या आई-वडिलांमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा कोणताही आनुवंशिक आजार नसणे हा मुद्दाही या संशोधनातील निवडीच्या वेळी महत्त्वाचा मानला गेला आहे.

डॉ. वैशाली इंगले -घोलप 
लन्दन 
dr.vaishali.ingle@gmail.com

आंबे

आंबे खा जपून...
पिवळ्याधम्मक आंब्याच्या प्रेमात पडला नाही, असा माणूस मिळणे विरळच. मे महिना आणि आंबा हे दोन्ही हातात हात घालून येतात. आंब्याची चव जिभेवर रेंगाळत
राहते आणि बस एक और... चा नारा बुलंद होतो. यात लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असतो.

फळांच्या या राजाचे आहारात भरपूर उपयोगही आहेत. अ आणि क जीवनसत्वांचा मोठा सोत असलेला आंबा त्वचेवरील सुरकुत्या कमी करून ती तरूण ठेवतो. त्यात बी कॉम्प्लेक्स असल्याने त्वचा तजेलदार करतो. कैरीमध्ये अॅण्टि ऑक्सिडन्ट वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे अमृतचवीचा आंबा खाण्यात भरपूर फायदेही आहेत. अर्थात पदार्थ कितीही चांगला असला तरी अति तेथे माती होते.

आंब्यामध्ये भरपूर काबोर्हायड्रेट््स आणि कॅलरीज असतात. त्यामुळे पटकन वजनही वाढते. त्यामुळे वजनाबाबत कॉन्शस असलेल्या व्यक्तींनी फार आंबे खाऊ नयेत. आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनीही त्यापासून चार हात दूर राहिलेलेच चांगले. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खा. खूप आंबे खाल्ले की पोटही बिघडते.

आंब्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे शरीरावर येणारे उष्णतेचे फोड. आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. या फोडांना गंमतीत आंबे फुटले का, असेही म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा प्रकार अनेकदा होतो. या फोडांना खाजही सुटते. याचा सरळ उपाय म्हणजे आंबे कमी करणे असा असला तरी केवळ मोसमात मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मोह सुटत नसतो, हेदेखील खरे. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलजीर् लक्षात येत नसल्याने तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वषीर् अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नका. एवढे करूनही फोड आलेच तर त्यावर गरम टॉवेल लावा. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकतील.

काही वेळा आंब्याच्या सालीमधील चिक लागून ओठाशेजारचा भाग तसेच गालावर रॅशेस येतात. हा प्रकार दुमिर्ळ असला तरी त्याबाबतही काळजी घेतली पाहिजे. आंबा नीट धुवावा. सालासकट आंंबा चोखून खाणे टाळावे. तसेच रॅशेस आले तर त्यावर मध लावावा. खूपच अॅलजीर् होत असेल तर आंबे टाळणे चांगले. अर्थात ज्यांना अशी अॅलर्जी असेल त्यांच्यासाठीच हे सारे आहे. इतरांनी आंब्याचा आनंद लुटायला हरकत नाही.



http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक
धुले 
  • 8275007220
  • 9960507983

Visit Our Page