Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, September 14, 2011

॥ एकांगवीर रस ॥

॥ एकांगवीर रस ॥

शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ।
ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥
सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
वराव्योषकनिर्गुण्डीवन्हिकार्द्रकजैः द्रवैः ॥
शिग्रुकुष्टद्रवेणापि ततो धात्र्या द्रवेण च ।
विषमुष्ट्यार्कहाटैःश्च आर्द्रकस्य रसैस्तथा ॥
रसश्चैकांगवीरोsसौ सुसिद्धो रसराड्‌ भवेत्‌ ।

पक्षघातं चार्दितं च धनुर्वातं तथैव च ॥
अर्ध्दांगं गृध्रसीं वापि विश्वाचीमपबाहुकम्‌ ।
सर्वान्वातामयान्हन्ति सत्यं सत्यं न संशयः ॥

भारत भैषज्य रत्नाकर
प्रथम खण्ड
एकारादि-रस
पृष्ठ क्र॰ १९५
पाठ क्र॰ ५८५

मूळ पाठ
वृद्ध निघण्टुरत्नाकर॰ वातव्याधीचिकित्साप्रकरणम्‌
================================॥
मूळ पाठ

सर्व आर्ष ग्रंथांत 'एकांगवीर रस' ,
सर्वप्रथम वृद्ध निघण्टु रत्नाकर मध्ये लिखित स्वरुपात दिसतो.

भारत भैषज्य रत्नाकर पाहिल्यास
इतर कोणत्याही ग्रंथात हा पाठ नसल्याचे दिसते.

एक पाठ असल्याने विशेषशुद्धी किंवा पाठ विनिश्चयाची विशेषत्वाने
गरज नाही.

तरीही वृद्धवैद्यक परंपरेत काय सांगितले आहे हे जाणून घेणे ही
आवश्यक आहे.

त्यासाठी, उपलब्ध ग्रंथसंपदेतील, "आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" ह्या
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं"च्या चिकित्सानुभव व
औषधी कल्पांचे सुस्पष्ट आयुर्वेद-शास्रीय विवेचन वाचनाचाच मार्ग
आद्य व अग्र्य ठरतो.

१.    शुद्धगन्धं    =    शुद्ध गंधक
२.    मृतं सूतं     =    मारीत पारद
३.    कांतं     =    कान्त लौह भस्म
४.    वंगं च     =     वंग भस्म
५.    नागकम्‌ ।    =    नाग भस्म
६.    ताम्रं     =    ताम्र भस्म
७.    चाभ्रं मृतं     =    अभ्रक भस्म
८.    तीक्ष्णं     =    तीक्ष्ण लौह भस्म
९.    नागरं     =    सुंठ
१०.    मरिचं     =    मिरे
११.    कणा ॥    =    पिप्पली
सर्वमेकत्र संचूर्ण्यं ,
भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
१.    वरा        =    त्रिफळा क्वाथ  
२.    व्योषक        =    त्रिकटु क्वाथ  
३.    निर्गुण्डी        =    निर्गुडी क्वाथ
४.    वन्हि        =    चित्रक क्वाथ
५.    शुद्धार्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    शुद्ध आल्याचा स्वरस
६.    शिग्रु        =    शेवगा त्वक् क्वाथ
७.    कुष्टद्रवेणापि ततो     =    कोष्ठ क्वाथ
८.    धात्र्या द्रवेण च ।    =    धात्री क्वाथ
९.    विषमुष्टी        =    कुचलाबीज क्वाथ
१०.    अर्क        =    रुई मूळ क्वाथ
११.    हाटैःश्च         =    कांडवेल क्वाथ
१२.    आर्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    आल्याचा स्वरस *

मात्रा     =    १/२ ते १ गुंज      
    =    ६० mg to १२० mg

काल    =    स, व्यानोदान /  व्यानोदान / अपानौ

फलश्रुती    =  
१.    पक्षाघातं
२.    अर्दितं
३.    अनुर्वातं
४.    अर्धाड्गं
५.    गृध्रसीं
६.    विश्वाची
७.    अवबाहुकम्‌
८.    सर्वान्वातामयान्‌
॥ =============॥ पक्षाघाते एकांगवीर रसः ॥ ===============॥
पक्षाघात अथवा अर्धांगवायु => (कोणाला होतो ?)
हा विकार १. त्रासिक, चिडखोर, संतापी

२. ज्यांच्या रक्तवाहिन्या उपदंशादिक विकारांच्यामुळे विकृत झालेल्या असतात,
अश्या माणसांना होतो.
 पक्षाघाताची सम्प्राप्ति कशी घडते ??=================>>
मनाच्याविरुद्ध काही गोष्टी झाल्यामुळे
असल्या तिडतिड्या माणसात
एकाएकी संताप येऊन
एकदम सर्व शरीरभर खळबळ उडून जाते,
त्यामुळे =>
१ } विकृत झालेल्या रक्तवाहिन्यांत रक्तसंचय जास्त होऊन
त्याचा दाब हा मेंदू व वातवाहि केंद्रे ह्यांवर होऊन
पक्षाघात उत्पन्न होतो;

किंवा

२} रक्तवाहिनी फुटून तिच्यातून रक्तस्राव होऊ लागतो.
आणि
रुधिराचा साठा...
ज्ञानकेंद्राच्या बाजूला झाल्यामुळे
त्या माणसाची जाणीवनेणीव नष्ट होते,
किंवा
थोड्या अंशाने कमी होते.
शरीरातीळ संचालनक्रियेवर त्याचा ताबा रहात नाही.
स्नायुंच्यामुळे शरीरातील चलनवलनादि व्यापार सुरु असतात.
स्नायुंवरचा ताबा कमी झाल्यामुळे
ते व्यापार होईनासे होऊन
रोगी विगलित झाल्यासारखा होतो,
चलनवलनादिकाच्या कार्यास विरोध येतो,व्यत्यय येतो
म्ह्णून
आयुर्वेदात त्याची गणना "वातविकृतीत" केली आहे.

ह्या आजारात साधारणतः
अवस्थाभेदाने दोन तर्‍हेची चिकित्सा करता येते.
अ ] तीव्र अवस्थेत
रक्तवाहिनी फुटून रक्ताचा स्राव झालेला असतो,
त्याचे
१ .प्रसादन करणे
२. फुटलेल्या रक्तवाहिनीचे घटक नवीन तयार होऊन
ती सांधली जाऊल अशी तजवीज करणे,
आणि

ब ] जुनाट अवस्थेत
रक्तवाहिनी फुगण्याची अथवा फुटण्याची शरीरास लागलेलि सवय नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या इकडे रक्तप्रसादन करणारी जी औषधे आहेत;
त्यात =>
१. ताप्यादि लौह
२. स्वर्णमाक्षिक भस्म
३. शिलाजतु
४. गुग्गुल
ही मुख्य आहेत.
याच्या योगाने रक्ताचे प्रसादन होऊन फुटलेली रक्तवाहिनी सांधते.
रक्तवाहिनी सांधली गेली म्हणजे थोडा कालपर्यंत बरे वाटते.
परंतु पुनः पूर्ववत्‌ कारण घडल्यास रोग्यास पुनः पक्षाघाताचा झटका येतो.
म्हणून रक्तवाहिन्यांना जडलेली ही सवय नाहीशी करणारे असे एखादे औषध या

जुनाट अवस्थेत देणे जरुर असते.
आयुर्वेदाच्या उपपत्तीप्रमाणे रक्ताचे वहनकार्य वायूच्या प्रेरकत्वामुळे घडून येत असते.
वाताच उद्रेक जास्त झाला म्हणजे रक्ताचे उद्वहन कार्यही जास्त वेगाने होते.
रक्तवाहिनीची फुटण्याची सवय नाहीशी करावयाची असल्यास
रक्ताचे उद्वहनकार्य बेतावर आणने जरुर असते.
हे कार्य एकांगवीराच्या योगाने चांगल्या प्रकारे घडून येते. ॥ =============॥ अर्दिते धनुर्वाते अर्धाड्गे एकांगवीर रसः ॥ ===============॥

पक्षाघात हा केवळ शरीराच्या अर्ध्या भागालाच होतो असे नाही,
तर कित्येक वेळेला
फक्त
एका हाताला
किंवा
एका पायाला
किंवा
कमरेच्या खालील भागाला
किंवा
तोंडाच्या एका बाजूला
अशा प्रकाराने
निरनिराळे पक्षाघात होतात.

ह्या सर्व ठिकाणी विशिष्ट स्नायूंची चलनवलनादि शक्ति कमी झालेली असते.
ह्या सर्व प्रकारात
एकांगवीर रस निरनिराळ्या अनुपानांबरोबर द्यावा.

धनुर्वाताच्या विकारात शरीराच्या कोणत्या तरी भागात अभिघातजन्य
किंवा
इतर अशी जखम झालेली असते
आणि ती जखम व्रणचिकित्सेच्या अनुरोधाने नीट चिकित्सित न झाल्यास आणि

दूषित झाल्यास त्या जखमेतून धनुर्वाताचे विवक्षित जंतू शरीरात प्रविष्ट होऊन

वातप्रकोपास निमित्तकारण होतात,
वातदोष स्नायू, व शिरा यात प्रकुपित होऊन सर्व शरीराला धनुष्याप्रमाणे वाकवितो,
आणि म्हणूनच यास धनुर्वात म्हणतात.
यालाच अपतानक, आयाम इत्यादि संज्ञा लक्षानुरोधे प्राप्त झालेल्या आहेत.

ह्या रोगाच्या प्रथमावस्थेत=>मोठ मोठाले झटके येऊन सर्वांग वाकते,
दाभाड बसते,
मनुष्यास शुद्धि असते,
परंतु गिळण्याची सोय असत नाही,
ह्या अवस्थेत ==>>"कालकूट रसा"<<== चा चांगला उपयोग होतो.
परंतु
दवीतीयावस्थेत =>तीव्रावस्था नाहीशी झाल्यानंतर, सर्वांगास एक प्रकारचा लुळेपणा आलेला असल्यास व स्नायूंची शक्ति क्षीण झाल्यासारखी असल्यास
==>>"एकांगवीरा"चा<<== त्यानंतर उपयोग होतो. ॥ ==========॥गृध्रसीं / विश्वाचीम्‌ / अपबाहुके एकांगवीर रसः ॥==========॥

कुल्ल्यापासून प्रारंभ होऊन
कंबर => मांड्या => गुडघे => जांघाडे व पायापर्यंत
वारंवार चमका निघतात.
सगळा पाय ताठल्यासारखा होतो.
पाय लुळा पडल्या सारखा होतो.
अति तीव्र वेदना कित्येक वेळेला होतात.
सुयांनी टोचल्यासारखे होते.
पण जागच्या जागी जखडल्यासारखा होतो
आणि
जरा वेळ पाय उभा केला,
की वारंवार त्यात स्पंद उत्पन्न होतात.
ह्या विकारास गृध्रसी अशी संज्ञा आहे.
गृध्रसीत वातप्रधान लक्षणे असता एकांगवीर द्यावा.

हाताच्या बोटांपासून वेदना सारख्या चढत चढत जाऊन हात अगदी भारावून जातात. बोटांनी काही काम होऊ शकत नाही यत्किंचित उचलले किंवा काही धरले, की सर्व बोटांतून सारख्या मुंग्या येऊन धरलेला जिन्नस पडून जातो, व तो केव्हा पडला ही जाणीव रहात नाही. या अवस्थेत एकांगवीर चांगला उपयोग होतो.

एकांगवीरात
कांत-वंग-नाग -ताम्र-अभ्रक-तीक्ष्णलोह ही बॄंहण, जीवन व रसायन औषधे आहेत.
वातरोगांत बृंहण हेच शमन असते. या न्यायाने ही वातशामक औषधे आहेत.

पारद कज्जली - रसायन, योगवाही  व जंतुघ्न अशी आहे.
भावना = वातप्रशमन करणार्‍याच औषधांच्याच आहेत.
हे औषध अत्यंत तीक्ष्ण आहे.
त्यामुळे त्याचा उपयोग वातप्रधान कीवा कफप्रधान विकारांत करावा.
पित्तानुबंध सता उपयोग करणे इष्ट नसते.
संदर्भ ग्रंथ = 
"आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" By
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

No comments:

Post a Comment

Visit Our Page