Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, October 30, 2011

उतारवयात अनुभवा कामजीवन!

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं.

... 

साठीकडे झुकल्यावर माणसाची कामातुरता कमी होते, हा एक सर्रास गैरसमज आहे. अमेरिकेत एकदा ५० ते ९२ वयोगटातील ४३४६ स्त्री-पुरुषांचं सवेर्क्षण घेण्यात आलं होतं. तेव्हा, साठी-सत्तरीतल्या वृद्धांनी स्पष्ट कबुली दिली होती की, त्यांचं कामजीवन सुरळीत चालू असून, त्यात त्यांना खूप रस वाटतो. ही सगळी शिकली सवरलेली मध्यमवगीर्य मंडळी होती. खरंतर वृद्धापकाळातही कामजीवन आपणास साथ देतं, हे वास्तव तरुण मंडळींनाही उत्साहवर्धक वाटणारं आहे. या सवेर्क्षणात, अडतीस वर्षं संसार केलेली बाई म्हणाली होती, 'माझा नवरा बाहेरून परत येणार असतो, तेव्हा मी त्याची आतुरतेनं वाट पाहत बसते. फोनवर त्याचा आवाज ऐकला किंवा त्याने घातलेली शीळ ऐकली की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.'

सदुसष्ट वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्ही प्रेमात पडलो अन् सरत्या काळात आमचं प्रेम वाढत गेलं. अजूनही आमच्या प्रेमाचा आलेख वर वर चढतोय.' आणि त्या सर्व प्रौढ दाम्पत्यांनी आपल्या संसारसुखाचं श्ाेय त्यांच्या निरामय कामजीवनास दिलं होतं.

वाढत्या वयानुसार माणसाच्या जिभेची चव, श्रवणशक्ती, दृष्टी, शारीरिक ताकद कमी होते, त्या प्रमाणे कामातुरतेवरही परिणाम होत असतो. शिवाय हृदयविकार, मधुमेहासारखे आजार त्यांच्या कामजीवनात अडथळे बनतात. पण या आजारांमुळे कामशक्ती ऱ्हास पावते असं मात्र मुळीच नाही.

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं. नियमित वीर्यपात होणाऱ्या पुरुषांचा मूत्रनलिकेतील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगापासून बचाव होतो. कामसुखामुळे वयोवृद्धांच्या शरीरातील रक्तदाबावर अनुकूल परिणाम होतो. शरीराचे मांसल स्नायू कार्यरत राहतात. संप्रेरकाचं सवण नियंत्रित राहतं आणि शरीरातील विविध ग्रंथींची पुनर्रचना होण्यास मदत होते.

इंग्लंडमधील रॉयल एडिनबर्ग इस्पितळातील डॉ. डेव्हिड क्लिस यांनी १९ ते १०२ वयोगटातील ३५०० जणांचं शास्त्रोक्त सवेर्क्षण केलं होतं. तेव्हा त्यांना आढळलं होतं की आठवड्यातून तीनदा समागम करणारी मंडळी कामसुखापासून वंचित होणाऱ्या मंडळींपेक्षा तुलनेने १० वर्षांनी तरुण दिसतात. तारुण्याच्या टिकाऊपणासाठी आनुवंशिकता केवळ २५ टक्के कारणीभूत असते, बाकी सर्व त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आणि वागणुकीवर अवलंबून असतं. कामसौख्यामुळे प्रौढांच्या मनावरचा ताण सैल होण्यास मदत होते. तसंच इण्डोफिर्नसारखी वेदनाशमक जीवरसायनं शरीरात निर्माण होतात. याशिवाय, कामसुख लुटताना शरीरात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिटोसिन या रसायनामुळे पती-पत्नीतील एकोप्याची भावना वाढते आणि जोडप्यात सुसंवाद होऊन त्यांच्यातील जीवनबंध घट्ट होत असतात.

अलीकडेच, स्वित्झर्लण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्यांच्या सवेर्क्षणात, पुन्हा एकदा, म्हाताऱ्या मंडळींमध्ये वाढणाऱ्या कामातुरतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अन् साठीनंतरचा काम ही काही पाश्चिमात्य लोकांची मक्तेदारी नाही, हे आपल्याकडील डॉक्टरमंडळींच्याही ध्यानी आता आलं आहे. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली कामशक्ती लय पावणार नाही ना, या शंकेने त्रस्त झालेले हृद्रोगी आहेत. म्हातारपणी होणाऱ्या पाकिर्न्सन आजारात खाल्लेल्या औषधांमुळे कामवासना वाढलेल्या आजीबाईही आहेत. इतकंच काय, हृदयाचा झटका आला तरी बेलाशक पण व्हाएग्रा वापरून लिंग ताठरता प्राप्त करून घेणाऱ्या आजोबांची उदाहरणंही आहेत.

आयुष्यातील मध्यमवयात खाणंपिणं भरपूर वाढलेलं असतं आणि थकवा येणं ही परिस्थिती बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असते. स्पर्धामय जीवनात सामाजिक, आथिर्क स्तर उंचावण्याच्या धडपडीत आपण नकळत आरोग्याला गहाण टाकत जातो आणि लैंगिक जीवनाच्या सुदृढतेवरही मोठा आघात करत असतो. सर्वसाधारण: आपल्याकडील समाजात लग्न झालं, मुलंबाळं झाली की सर्व संपलं असा समज करून स्त्रिया आपलं जीवन आचरण सुरू करतात. त्यांचा वस्त्रप्रावरणांबद्दलचा नीटनेटकेपणा हरवतो. शरीराच्या आकारमानावरील ताबा सुटतो. या आणि अशा दुर्लक्षित बाबींमुळे पती-पत्नीतील आकर्षण कमी होऊ शकतं. हे आकर्षण जपून ठेवणं म्हणजे 'निज शैशवा'स जपून ठेवण्यासारखं आहे. शिवाय, शक्य तेवढं वाचन करून ज्ञानवृद्धी करणं, आपल्यातील कलागुणांचा विकास करणं यांसारख्या गोष्टींद्वारे पतीपत्नीने वैचारिकदृष्ट्या जवळीक साधली तर त्यांच्यातील आकर्षण सतत वाढीस लागतं. त्यामुळे उतरत्या वयातील कामजीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो, हे सांगणे न लगेच. 





जोसेफ तुस्कानो 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3319369.cms

No comments:

Post a Comment

Visit Our Page