Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, April 14, 2012

नोकरी करणाऱ्या स्त्रिया व त्यांचे आरोग्य

जे काही सामिजिक बदल घडले, घडत आहेत त्याचा परिपाक म्हणून पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनी देखील नोकरी करावी हि प्रत्येकाची इच्छा असतेच व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्याची आवश्यकता देखील भासते.

स्त्रिया तुलनेने नाजूक प्रकृतीच्या असल्यामुळे त्यांना बाहेरील नोकरीचे कष्ट व त्याच बरोबर स्वतःच्या घरातील श्रम हे दोन्हीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पडतात. म्हणूनच त्यांचे आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता असते. तसेच स्त्री ही आपले घरकुल सांभाळणारी प्रमुख जबाबदार व्यक्ती असल्याने तिचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम सर्व घरावर होऊ शकतो. म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या कुटुंबीयांनी व स्वतः स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. 

नोकरी कुठलीही असली तरी स्त्रीला आपली नाजूक प्रकृती, मासिक पाळी, विवाहपूर्व काळ, विवाह पश्चात काळ, गर्भारपण, बाळंतपण, रजोनिवृत्ती या शारीरिक बदलत्या परीस्थितीना तोंड द्यावेच लागते.

गर्भारपण व बाळंतपण यासाठीची मिळणारी रजा संपल्यावर स्त्रीला लगेचच नोकरीला पुन्हा जायचे असते. या काळात योग्य उपचार व आवश्यक विश्रांती न मिळाल्यास शरीराची झीज भरून येत नाही आणि सांध्याचे विकार, स्थूलता अशा अनेक समस्यांनी स्त्री ग्रासली जाते. 

अंगावर दूध पिणारे बाळ घरी टाकून जावे लागत असल्याने स्त्रीची मानसिक ओढाताण होते. स्तनात दूध साठून नंतर त्याचे इन्फेक्शन इ. त्रास देखील होतो.

चाळीशीनंतर शरीरात हार्मोनल बदल घडून मासिक पाळी नैसर्गिक रित्या थांबते त्यास रजोनिवृत्ती असे म्हणतात. या काळात मन नाजूक बनते. व अशातच सेवा जेष्ठतेने नोकरीच्या अनेक महत्वाच्या जबाबदारया त्या स्त्री वर पडतात.

घ्यावयाची काळजी -
आयुर्वेद शास्त्रा नुसार वाताज, पित्तज, कफज अशा तीन प्रकृती आहेत. आयुर्वेद तद्याकडे जाऊन आपली प्रकृती तपासून त्या अनुसार आहार, विहार व उपचार घ्यावेत. 

काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा. आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी. आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा. सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्‌) न्यावीत.
काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्‍या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.


- डॉ. जितेश प्र. पाठक 
आयुर्वेदाचार्य 
http://www.facebook.com/drjiteshpathak


  • 8275007220
  • 9960507983

Visit Our Page