Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, October 23, 2015

गर्भावस्था ९ महिन्यांची की १० महिन्यांची ???

गर्भावस्था ९ महिन्यांची की १० महिन्यांची ???
"औषधी गर्भसंस्कार " उत्पादनांची नावे पाहिल्यावर आपल्या मनात नक्कीच शंका येईल ती "दशमाह" पाठावरून. गर्भावस्था सर्वसामान्यपणे नऊ महिन्यांची असतांना हा दहावा महिना कुठून आला व कशासाठी ?
गर्भावस्था २८० ते २८३ दिवसांची असते हे शास्त्रसंमत व सर्वानुभूत आहे. प्रचलित कालगणनेनुसार हा कालावधी अंदाजे ९ महिने व ९ दिवसांचा होतो. आयुर्वेदात गर्भावस्था ही एकूण दहा महिन्यांची सांगितली आहे. स्त्री शारीर क्रियेच्या दृष्टीने "महिना" हा काळ २८ दिवसांचा समजणे इष्ट आहे.
"औषधी गर्भसंस्कार" संकल्पनेचा आधारभूत ग्रंथ, अष्टांग हृदय, शारीरस्थान १/७ ह्यामध्ये देखील "मासि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहं" असेच वर्णन आढळते. अर्थात, स्त्रियांमध्ये दर महिन्याला तीन ते चार दिवस ऋतुस्राव होत असतो. मासिक ऋतुस्रावाची पुनरावृत्ती दर २८ दिवसांनी होते, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. ह्या न्यायानुसार महिना म्हणजे "२८ दिवसांचा कालावधी" हा त्याचा गर्भित शास्त्रार्थ आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने देखील इस्ट्रोजिन व प्रोजेस्टेरॉन चे चक्र सुद्धा २८ दिवसांचेच असते.
गर्भावस्थेच्या दृष्टीने ३०, ३१ किंवा २८ तर कधी कधी २९ दिवसांचा महिना मोजणे हे निश्चितच सयुक्तिक होत नाही. म्हणूनच अशा विचाराने केलेली औषधयोजना देखील अचूक होणार नाही. मासिक ऋतुस्रावाचे चक्र व पुढील गर्भावस्था लक्षात घेऊन ग्रंथकर्त्यांनी १० महिन्यांचे १० पाठ सांगितले आहेत त्यामागची शास्त्रीय बैठक किती खंबीर आहे हे आपल्या लक्षात येते.
गर्भधारणे नंतर मासिक रजःस्राव खंडित होतो तरीदेखील त्याचे भविष्यातील आराखडे २८ दिवसांच्या चक्रानुसार निसर्गतः आखले जातात. त्याचबरोबर अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रावांमध्ये होणारे बदल हे देखील २८ दिवसांच्या टप्प्यानेच होत असतात. ह्या अनुषंगाने निरनिराळ्या अवस्थांमध्ये होणारी स्थित्यंतरे दहा महिन्यांमध्ये विभागून सांगितली आहेत व त्यामागे हाच शास्त्रीय उद्देश आहे. ह्याच दोन कारणांस्तव "औषधी गर्भसंस्कार" मालिकेतील पाठांचा अवलंब करताना महिना म्हणजे "२८ दिवसांचा काळ" समजणे सर्वदृष्टीने समयोचित आहे.
आयुर्वेद हे एक परिपूर्ण वैद्यक शास्त्र आहे व त्याचे सिद्धांत काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आहेत. अशा शास्त्रात वर्णन केलेले "औषधी गर्भसंस्कार" करतांना त्यातील कालगणना देखील तंतोतंत पाळणे अनिवार्य आहे. 'गर्भावस्था ९ महिन्यांची' असा विचार करून केलेली औषध योजना नक्कीच अपूर्ण अथवा चुकीची होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्या विचारांचे समर्थन विविध नामांकित आयुर्वेद महाविद्यालये, रुग्णालये व ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक यांनी जाहीरपणे केले आहे.
"औषधी गर्भसंस्कार" उत्पादनांच्या मालिकेत समाविष्ट औषधी पाठात फक्त वनस्पतींचाच वापर केला आहे. ह्या वनस्पती स्वगुणधर्मांनी संपन्न आहेतच तसेच शरीरावर कोणतेही अनिष्ट परिणाम करणाऱ्या नाहीत व गर्भावस्थेत वापरण्यास संपूर्णपणे सुरक्षित आहेत. परिणामी, गर्भाचा विकास व मातेचे पोषण यांचे सुरेख संतुलन त्यामुळे राखले जाते.

Manoj Anant Joshi(मनोज अनंत जोशी)

AKSHAY PHARMA REMEDIES (INDIA) PVT. LTD.

No comments:

Post a Comment

Visit Our Page