Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

"औषधी गर्भसंस्कार"..........

"औषधी गर्भसंस्कार"..........

एक शास्रीय प्रकाशन व उत्पादने
"गर्भविकास आणि मातृपोषणाचा अद् भुत संगम"
प्रत्येक दाम्पत्याला निकोप व सुधृढ बालक हवे असते. ते त्यांचे सुंदर स्वप्न असते. त्यासाठी ते मनापासून प्रयत्नशील असतात. बालक निकोप व सुदृढ तर हवेच, त्याचबरोबर मातेची प्रसुतीही नैसर्गिक पद्धतीने आणि संकटमुक्त व्हावी, अशीही अपेक्षा असते. केवळ पती-पत्नीच नव्हे तर साऱ्या जवळच्या नातेवाईकांची हीच अपेक्षा असते. सतयुग असो वा कलियुग, ह्या अपेक्षा अनादी काळापासून तशाच आहेत, आणि पुढेही तशाच राहणार ह्यात दुमत होणे असंभव. ह्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करणारी, विशेष पद्धतीने कार्य करणारी १६ उत्पादने "अक्षय उद्योग समूहाने" निर्माण केली. ती उत्पादने व त्यामागील शास्त्रीय सिद्धांत आपल्याला "औषधी गर्भसंस्कार" पुस्तिकेच्या स्वरुपात आम्ही सुपूर्द करीत आहोत.
आयुर्वेद प्राचीन आहे. ह्या प्राचीन आयुर्वेदात समग्र मानवी जीवनाचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केला गेला आहे. निरोगी राहण्यासाठी अनंत प्रकारचे आहार, विहार, औषधोपचार व सर्वप्रकारे दक्षता घेवूनही रोग झालाच तर त्याचे निराकरण करण्याचे अगणित उपाय ह्या शास्त्रात विस्ताराने दिलेले आहेत. त्यामुळेच हे प्रभावी शास्त्र आज एकविसाव्या शतकातही साऱ्या विश्वात लोकप्रिय होत आहे.
आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्यात मातृत्व प्राप्तीच्या विषयावर यथासांग विवेचन उपलब्ध आहे. ह्या विवेचनाचा उपयोग गर्भधारणा, गर्भसंगोपन, सुलभ प्रसूती, बालकल्याण अशा सर्व टप्प्यांमध्ये कसा होऊ शकतो ते विस्तृतपणे ह्या पुस्तिकेत सोप्या शब्दात सांगितले आहे.
मूळ आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लग्नासाठी मुलीचे वय सोळा वर्ष, तर मुलाचे वीस वर्ष असावे असे वर्णन केले आहे. ह्या वयाला 'समत्वागतवीर्य' म्हटले आहे. म्हणजेच ह्या वयात विवाह होऊन गर्भधारणा झाली तर स्त्री व पुरुषाचे दोष-धातु सर्वोत्तम स्थितीत असतात व निकोप गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात दोषांचे संतुलन बिघडत जाते व गर्भधारणेच्या दृष्टीने थोडी कठीण परिस्थिती उत्पन्न होउ लागते.
एकविसावे शतक किती धकाधकीचे, धावपळीचे, चिंता आणि ताण-तणावाचे झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कायद्याची वयोमर्यादा, शिक्षणाचा कालावधी, आर्थिक स्थैर्य, विभक्त कुटुंब पद्धती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता विवाहाचे वय काळाच्या ओघाने आपोआपच वाढत जात आहे व त्याचा परिणाम स्त्री-पुरुषांच्या प्रजनन संस्थेवर होतो व पर्यायाने पुढच्या पिढीवर सुद्धा. हे दुष्टचक्र कुठे थांबवता येईल का ? कलियुगाची ही जीवनपद्धती तर बदलणे शक्य नाही, मग त्याचे दुष्परिणाम कसे आटोक्यात आणता येतील ?
ह्या सर्व समस्यांचे सकारात्मक निवारण फक्त आयुर्वेदातच सापडते. मूळ ग्रंथातील विवेचन अभ्यासताना थक्क होण्याची पाळी येते. ह्या विषयातील एक एक पैलू घेऊन त्यांची उपयुक्तता आणि सर्वांगीण लाभ स्त्रीला व होणाऱ्या बालकाला कसकसे प्राप्त होऊ शकतात हे आता पुढे पाहूया:
आयुर्वेदानुसार प्राकृत गर्भधारणा होण्यासाठी ४ गोष्टी योग्य प्रकारे एकमेकांना अनुरूप व पोषक असाव्या लागतात.
१) ऋतु… … गर्भाधानास योग्य काळ.
२) क्षेत्र… … गर्भाशयाची योग्य स्थिती.
३) अम्बु… … योग्य पोषक घटक.
४) बीज… … स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज.
ऋतु ... गर्भाधानास योग्य काळ
२८ दिवसांचा काळ हा मासिक ऋतु स्रावाचा प्राकृत काळ समजला जातो. मासिक स्रावाच्या पहिल्या दिवसापासून पुढे "दहा ते अठरा हा ८ दिवसांचा काळ" गर्भस्थापनेसाठी सुयोग्य असतो. इतर दिवशी संबंध ठेवण्याने प्रायः गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा न होण्याच्या काळाला "सेफ पिरियड" म्हणतात. सध्या सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो.
सोनोग्राफी करणे तुलनेने कमी खर्चिक व अतिशय निर्धोक असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यास हरकत नाही. कायद्याच्या दृष्टीकोनातून सोनोग्राफी करण्यास काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्भलिंग निदान व त्यामुळे होणाऱ्या भृणहत्या टाळण्यासाठी शासनाने हे कायदे आता कटाक्षाने अमलात आणण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
क्षेत्र ... गर्भाशयाची योग्य स्थिती
गर्भाशयाच्या रचनेत जन्मतः दोष असू शकतो. साधारणतः ३ ते ४ टक्के स्त्रियांमध्ये असे दोष असतात. अशा दोषांमुळे गर्भस्थापना होऊ शकते परंतु गर्भाची वाढ पूर्ण काळ होत नाही. गर्भाशयाच्या रचनेत काही दोष असल्यास ऋतुचक्राच्या तक्रारी उद्भवू शकतात. विशेषतः मासिक स्रावाच्या दिवसांमध्ये तीव्र वेदना होणे हे मुख्य लक्षण असते. सोनोग्राफीच्या सहाय्याने ह्या दोषाचे निदान करता येते.
अम्बु ... योग्य पोषक घटक
झाडांच्या वाढीसाठी जसे खत - पाणी तसेच गर्भाशयाच्या व पर्यायाने गर्भाच्याही पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व "अम्बु" समजावेत. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. घटकांचा योग्य समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा उत्तम समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
बीज ... स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज
जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यवस्थित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येऊ शकते.
पुरूषबीजांची म्हणजेच शुक्राणूंची संख्या २० ते ४० दशलक्ष प्रति मि. ली. एवढी असते. किंबहुना एवढी असल्याशिवाय गर्भधारणा बहुधा होतच नाही. त्यातील फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा घडवतो, तरीपण ही संख्या कमी असून चालत नाही. शिवाय त्यांची चलनवलन क्षमता, स्वरूप, अम्लता ही देखील महत्वाची असते. शुक्राणु सर्व दृष्टीने निरोगी असणे जरुरीचे असते.
स्त्रीबीज किंवा पुरुषबीज दोषयुक्त असता गर्भधारणा झाली तर बहुतेकवेळा गर्भस्राव होतो. त्यातूनही गर्भधारणा झालीच तर होणाऱ्या बालकामध्ये जन्मतः व्यंग राहते व अशा बीजदोषामुळे निर्माण झालेले व्यंग कायमस्वरूपी राहते.
मुळातच स्त्री देह नाजुक, त्या नाजुकपणातही हवीहवीशी वाटणारी संवेदनशील अवस्था म्हणजे 'गर्भावस्था'. पहिल्या गर्भारपणात तर स्त्रीला ही अवस्था अगदीच नवीन, औत्सुक्याची व कुतुहलाची असते. एका जिवंत शरीरातून दुसऱ्या चैतन्यमय शरीराची निर्मिती करणे ही निसर्गाची एक आश्चर्यजनक आणि थक्क करणारी किमया आहे. गर्भधारणा प्रक्रियेत कारणीभूत असलेला प्रत्येक घटक, त्यातील रसायने, त्यांचे प्रमाण सर्व काही माहिती असले तरी स्त्री आणि पुरुषाच्या जिवंत शरीराशिवाय असा नवीन देह निर्माण करण्याची जादू अजून ह्या पृथ्वीतलावर कोणी साकार करू शकलेले नाही.
प्राचीन आयुर्वेदात सुदृढ व निकोप अपत्यप्राप्ती साठी अचूक मार्गदर्शन केले आहे आणि गर्भासंबंधी सर्व दोष निवारण करण्याची क्षमता असणारे निश्चित असे औषधी पाठ सांगितले आहेत. शास्त्रशुद्ध व कालानुरूप सुयोग्य बदल करून हे पाठ विलेपित वटी व तेलाच्या स्वरुपात आम्ही सादर करीत आहोत. त्यांचे नामकरण व संक्षिप्त उपयोग पुढील प्रमाणे :-
१) अश्वमाह - शुक्राणु दोष निवारण, सामर्थ्य, संख्या व गती वर्धन
२) फलमाह - स्त्रीबीज दोष निवारण, सामर्थ्य व रोगप्रतिकारशक्ती वर्धन, विद्युत-चुंबकीय लहरींच्या दुष्परिणामांपासून संरक्षण
३) प्रथमाह - गर्भाशय स्थिती सुधार व स्थापक
४) द्वितिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
५) तृतिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
६) किक्किस निवृत्ती तेल - तणाव चिन्ह (स्ट्रेचमार्क्स) प्रतिबंध
७) चतुर्माह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
८) पंचमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
९) षष्ठमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१०) सप्तमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
११) अष्टमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१२) सुप्रसव पिचु तेल - सुलभ, सुरक्षित व नैसर्गिक प्रसव, स्नायू बलवर्धन व जंतु-संसर्ग प्रतिबंध
१३) नवमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१४) दशमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१५) सूतिकाभ्यंग तेल - प्रसुती पश्चात मातृस्वास्थ्य रक्षणासाठी अभ्यंग
१६) क्षीरमाह - स्तन्यप्रवर्तन, शोधन व वर्धन
गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात क्रमाक्रमाने करावयाची ही "औषधी गर्भसंस्कार" योजना आहे. प्रत्येक औषधी घटकाचा उपयोग कसा होतो, ह्यांचा शास्त्राधार काय व त्यावरील संशोधनात्मक शास्त्रीय संदर्भ नेमके कोणते ह्याचे औत्सुक्य सर्वांनाच असणार. ह्या माहिती पुस्तिकेत पाठांतील प्रत्येक घटकाचे कार्मुकत्व प्रतिपादित केलेले असून त्यांचे संदर्भ एकत्रितपणे परिशिष्टात दिले आहेत.
मनोज अनंत जोशी 

No comments:

Post a Comment

Visit Our Page