Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 30, 2015

"स्वानंदीच्या लेखणीतून..."

"स्वानंदीच्या लेखणीतून..."


"बरे झाले रिकामी भेटलीस."
देशपांडे काकू वैद्या स्वानंदीच्या केबिनमधे शिरत म्हणाल्या.
"ओह, sorry हं काकू; मी तुमच्या 'पुजेला' नाही येऊ शकले."
कोकिला व्रताच्या 'उद्यापनाला' जाऊ न शकल्याने संकोचून स्वानंदी म्हणाली.
"ठीक आहे, एका अर्थाने 'बरेच' झाले, व्रत करून माझ्यासारखी तूच आजारी पडली असतीस; तर मला औषध कोणी दिले असते."
काकू मोकळेपणाने बोलल्या.

काकुंचा हाच स्वभाव तिला आवडतो, चार दिवसापूर्वी त्या  'ह्याच' व्रतासाठी तिला बोलवायला आल्या होत्या; तेव्हा तिने pt. चे कारण दिले, तर म्हणाल्या होत्या,"तुम्हा आजकालच्या मुलींना व्रत- वैकल्याचा भारी 'कंटाळा'. वगरे वगरे...!"
आणि आज हे!
असे 'निरागस' त्याच वागू शकतात.

"कशी झाली पूजा?"- स्वानंदी मनगटावर हात ठेवत 'नाड़ी परिक्षण' करत म्हणाली.
बस.....

पुढची 15-20 मिनिटे त्या पूजा,कहाणी,आरती,प्रसाद.. मग होम, उद्यापन,पुरणाचे मांडे व खीरीचा साग्र संगीत 'नैवेद्य' ह्याबद्दलचे 'रसभरीत' वर्णन ऐकवत बसल्या.
"पुजेचे तीन दिवस उपवास असून,एवढी धावपळ करूनही कसे 'प्रसन्न' वाटायचे.
आणि काल उपवास सोडला आणि आज सकाळपासून डोके चढले.
अपचन,acidity,चक्कर, थकवा काही विचारू नकोस."
काकुंनी एका दमात आजार आणि आजाराचे कारण दोन्ही सांगून टाकले.

"काकू ,काल तुम्ही 'यज्ञ ' करताना तूप,कापूर, समिधा हळू हळू टाकून ,शेवटच्या आहुतिपर्यन्त 'अग्नि' तेवत ठेवला की, अग्नि प्रज्ज्वलित झाल्यावर एकदम सर्व आहुति टाकल्यात?"
स्वानंदीच्या प्रश्नाने काकू गोन्धळल्या.
"अगं एकदम टाकला तर अग्नि विझुन नाही का जाणार?"

"मग काकू, हीच गोष्ट तुमच्या पोटातल्या 'जाठराग्निला' देखील लागू होते.
तीन दिवस 'उपवास' म्हणजेच 'लंघन' करून तुम्ही पोटातील 'जाठराग्निचा यज्ञ' छान पेटवलात;
पण नैवेद्य रूपी समिधा 'एकदम' टाकून तो 'विझायला' मदतच केलीत.
तुमच्या कोकिला गौरीने सांगितले होते का, की मला पुरणाचे मांडे आणि खीर हवी?"

आता ही माझी कहाणी ऐका.....
1. जेवणापूर्वी आले ,लिम्बु ,सैंधव चावून खावे.
2. भूक 'लागल्यावरच' दोन घास भूक 'राहील' असे जेवावे.
3. दुपारचे जेवण 12 ला आणि रात्रीचे सुर्यास्तापूर्वी करावे.
4. दुपारी झोप 'वर्ज्य'.
5. रात्री शतपावली 'नेमाने'.
6. हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि क़पाल भाति रिकाम्या पोटी 'रोज'.
7.आहारात सुंठ,मीरे,पींपळी, हींग जीरे,सैंधव, लसुण ह्याचा पुरेसा वापर.
8.पुढील 5 दिवस आहाराचे प्रमाण क्रमाने वाढवणे.
9. जुना तांदूळ किंवा भाजलेल्या तांदुळाची पेज, मुगाचे कढण, साळीच्या लाह्यांची पेज, मऊ भात, मुगाची खिचड़ी आदि गोष्टी क्रमाने फ़ोडणी शिवाय व नंतर फोड़णी देवून खावे.
10. स्वतःच्या मना 'पूर्वी' वैद्यांचे म्हणणे ऐकावे.

ही साठा उत्तराची कहाणी दहा उत्तरी सुफ़ल संपूर्ण!!!"
तिने लिस्ट लिहून कागद काकुंच्या हातात सोपवला.

"बाई ग, त्यापेक्षा तू मला saline लावून 2-3 तास झोपवले असतेस, इतर डॉक्टरां सारखे!"
काकू कागद वाचून म्हणाल्या.

"त्याने तुमच्या पोटातील 'gas' वाढला असता आणि 'पायावरची सुजही'; शिवाय 'किडनी' मैडमचे काम वाढले असते."
हसत हसत स्वानंदी म्हणाली.

"हो ,पण तू ही कामच वाढवलेस, शिवाय पुढे श्रावणात उपवास आहेतच की अजून,आत्ताच जरा चांगले चुंगले खावून घेणार होते."
काकू हिरमुसुन म्हणाल्या.

"काकू मी तुमच्या 'पचन संस्थेचे 'काम 'कमी' केलेय,
आणि असेच नियम तुम्ही कोकिला गौरीसाठी करतच होता ना; तेच आता 'आत्म देवतेसाठी'करायचे!
'दाक्षायणीला सुद्धा दहा हजार वर्षे कोकिला रुपात राहिल्यावर पार्वतीचा जन्म निळाला' , मी तुम्हाला 5-6 दिवस सांगितले आहे फ़क्त."
स्वानंदी हसत म्हणाली.

"म्हणजे ,तू कहाणी वाचलीस तर,व्रत करणारेस वाटते." काकुंची कळी खुलली.
"हो काकू,पण व्रत स्वताच्या शरीरासाठी आयुर्वेदोक्त पद्धतीने!

"आणि हो श्रावण सुरु होण्यापूर्वी जसे 'देवघर' स्वच्छ कराल ,तसेच पंचकर्म विशेषतः 'बस्तीने'शरीर 'शुद्ध' करायला विसरु नका."

"हो ग बाई, आणि तुझ्याकडून आयुर्वेदोक्त उपवासाच्या पदार्थांची लिस्ट पण घेऊन जाईन!"
जाताना काकुंच्या चेहऱ्यावरचे 'हास्य' हीच खरी स्वानंदीची fees होती!
-
वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़
आदित्य आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
आडगाव, नाशिक 422003

Email- drsonali2014@gmail.com
ब्लॉग--
beliveindetox.wordpress.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page