Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, December 15, 2015

मुळव्याध

मुळव्याध

          सामान्यत: मुळव्याधीची लक्षणे दिसेपर्यंत कुठल्याही प्रकारचे चिकित्सा घेतली जात नाही. शौचाच्या मार्गाने रक्त पडत असेल तर स्वभावपरमवादाने ते दुरूस्त होण्याची वाट पाहीली जाते म्हणजे शरीराने स्वतः जीव रूपी रक्ताचा अटकाव करावा हे म्हणता येईल. पण शरीरबलापेक्षा व्याधी बल अधिक असेल तर मग रक्त पडण्याचे थांबत नाही मग औषधी उपचार घेतले जातात. पण मुळव्याध जीर्ण झाल्याने शरीराला शत्रुप्रमाणे कापत असते. औषधींनी रक्त थांबले की चिकित्सा बंद होते.
अपुनर्भव चिकित्सा म्हणजे आजार कमी झाल्यावर पुन्हा होउ नये याकरिता काहीही त्रास नसता रसायन औषधी पथ्यपाळुन ज्याने शरीरबल वाढेल आणि आजाराचे बल कमी होईल अशाप्रकारची अपुनर्भव चिकित्सा कुठल्याही आजार कमी झाल्यानंतर पुन्हा उत्पन्न होउ नये याकरिता आवश्यक आहे.
          मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे समजलि तर मुळव्याधीचा त्रास होण्यापुर्विच शत्रुवत मुळव्याधीला जिंकता येईल. मुळव्याधीचा पुर्वरूपे...........
१.भुक मंदावणे, पोट फुगणे, मांड्या गळाल्याप्रमाणे वाटणे
२.पोटरया दुखणे, चक्कर येणे, अंग गळुन जाणे ,डोळे सुजणे,
मळ पातळ होणे वा मलबध्दता,अपान वायु कष्टाने सशब्द बाहेर पडणे,बाहेर पडताना टोचल्यासारखी व कातरल्यासारखी पीडा होणे ,आतड्यात आवाज येणे,पोटत गुडगुड होणे, शरीर बारीक होणे, ढेकर फार येणे, लघविला अधिक प्रमाणात होणे मलाचे प्रमाण कमी असणे, अन्नावर मन नसणे, घशाशी आंबट येणे, डोके पाठ उरात दुखणे,आळस येणे, शरीराचा प्राकृत वर्ण बदलणे, इंद्रिय बल कमी होणे, राग फार येणे, मोठ्या व्याधींची भिती ही मुळव्याध होण्यापुर्विची लक्षणे आहेत. यातिल जेवढे जास्त लक्षणे तेवढा व्याधी बलवन असतो त्यामुळेच पुर्वरूपातिल कमीत कमी लक्षणे समजत असताना योग्य उपचार व सल्ला घ्यावा .व्याधी जीर्ण होण्याची वाट पाहु नये नाहीतर मुळव्याध शत्रुप्रमाणे शरीराची वाट लावते...........
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
रामानंद नगर
पावडेवाडी नाका
 नांदेड.वैद्य गजानन मॅनमवार
9028562102 ,9130497856

1 comment:

Visit Our Page