Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, January 11, 2016

ओज ---आयुर्वेदीय विचार


ओज ---आयुर्वेदीय विचार

ओजाची उत्पति
 ओज सर्व शरीरगत असुन थंड स्नेहयुक्त स्थिर असते. ह्रदयाच्या ठिकाणीही ओजाचे काही बिंदु असतात ह्रदयाच्या गतीची स्थिरता टिकवणे ओजवर अवलंबुन असते. शरीराच्या शक्ती बल वाढविण्यासाठी याचा फारच उपयोग होतो.
जसे (भ्रमर) मधमाश्या फुले व फळातुन रस एकत्र करून मध तयार करतात. त्याचप्रमाणे शरीरातील गुण (रसरक्तादी ७धातु) अवयव आपल्या कर्माने ओजाला बल देतात.
शरीरातील जीवाची स्थाने
जीवे वसति सर्वस्मिन्देहे तत्र विशेषतः|
वीर्ये रक्ते मले यस्मिन् क्षीणे याति क्षयं क्षणात्||
जीव सर्व शरीरात वसलेला असतो. पण विशेषरितीने वीर्य रक्त आणि मळ यामध्ये राहतो. या पदार्थांपैकी १ जरी पदार्थ क्षीण झाला असता जीवही नाश पावतो.
ओजक्षयाची कारणे
 १. व्यायामात - अधिक प्रमाणात व्यायाम केला असता..
२. अनशन - नेहमी उपाशी राहणे. अत्याधिक प्रमाणात उपवास केल्याने
 ३. चिन्ता - नेहमी चिंता केली जात असेल तर
 ४. रूक्षाल्पप्रमिताशनम् - कोरडे तेल तुप रहित टोस्ट बिस्किट असे पदार्थ नेहमी खाल्याने, नेहमी अल्प प्रमाणात शरीराच्या गरजेपेक्षा कमी प्रमाणात आहार घेतला जात असेल, एकाच रसाचा प्रकारचा आहार घेणे नेहमी अत्याधिक तिखट वा आंबट पदार्थ खाणे..आदीने
 ५. वातातपौ - नेहमी वारयाला वा उन्हात फिरल्याणे बसल्याने ओजाचा क्षय होतो.
६. भय शोक - नेहमी भिती वाटत असेल, कुठल्याही गोष्टीचा शोक दुख मनात घर करून राहत असेल तर
 ७. रूक्षपानं - नेहमी रूक्ष गुणात्मक पदार्थांपासुन बनविलेल्या मद्याचे सेवन केले जात असेल तर
 ८. प्रजागर - नेहमी नेहमी रात्री जागरण होत असेल तर
 ९. कफशोणितशुक्रांणा मलानां चातिप्रवर्तनम् -- कुठल्याही कारणाने शरीरातुन कफ, रक्त, शुक्र आणि मळ अधिक प्रमाणात निघत असेल तर ओजक्षय दिसुन येतो.
नेहमी सर्दी खोकल्याने वा आव रूपात कफ बाहेर पडत असेल तर..
मुळव्याध वा अन्य कारणाने शरीरातुन रक्त अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल तर...
कुठल्याही कारणाने अधिक प्रमाणात शुक्र शरीराच्या बाहेर पडत असेल तर ओजक्षय होतो.
शरीरातील मल कुठल्याही कारणाने अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल तर.. त्यात मधुमेह झाला असता नेहमी नेहमी मुत्रप्रवर्तन झाल्याने वा ibs मध्ये अत्याधिक प्रमाणात मल बाहेर पडत असेल तर ओजक्षय होतो. किंवा अत्याधिक प्रमाणात घाम चरबीचा मल शरीराच्या बाहेर पडत असेल तर ओजाचा क्षय होतो.
१०. काल - वयाच्या वृध्दावस्थेत बल कमी झाल्याने ओज कमी कमी होत जाते..
वरील कारणांनी शरीरातील ओज तेज कमी होतो क्षय पावतो..
ओज कमी होत असताना पुढील लक्षणे दिसतात..
बिभेति दुर्बलो$भीक्ष्णं ध्यायति व्यथितेन्द्रियः| दुश्छायो दुर्मना रूक्षः क्षामश्चैवौजसः क्षये|| च.सु.१७
ओजाचा क्षय झाला असेल तर मनुष्य नेहमी भयभित असतो, नेहमी चिंतित ध्यानमग्न असतो, इंद्रिय आपले कर्म करण्यात असमर्थता दर्शवितात. शरीराची कांती मलिन होते, मन उदास राहते, शरीरात रूक्षता वाढिस लागते. शरीर पुर्वीपेक्षा कृश बारिक होत जाते.
ह्रदयाच्या ठिकाणी असणारे ओज कमी होत असेल तर ह्रदयाची गती वाढुन palpitation होते.
वरील लक्षणे दिसत असतिल तर ओजक्षय होत आहे हे समजते. घडणारी वेगवेगळी ओजक्षयाची कारणे बंद करून केलेले उपचार चिकित्सा उपयोगी ठरते. अन्यथा ओज कमी कमी होत जाऊन प्राणाचा नाश देखील होउ शकतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 वैद्य गजानन मॅनमवार
 मो. 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page