Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, January 19, 2016

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

        नमस्कार मित्र हो आजकाल आपण नेहमी ऐकत असतो कि मित्रांच्या वडिलांची बायपास झाली शेजारच्या काकूंची प्लास्टि झाली, अशी बरेच उदाहरणे आपण सर्रास ऐकतो आहोत. त्यासोबत हे हि ऐकतो कि एक गोष्ट छान झाली कि ऑपरेशन हे अल्प खर्चात झालं किंवा राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झालं.
याचा आनंद खूप लोकांना होतो कारण ऑपरेशन झालं ते पण मोफत.
           पण या गोष्टीचा खरच विचार आत्तापर्यंत कोणी केलाय का कि खरच बायपास किंवा प्लास्टि ची गरज होती का कि मोफत होत म्हणून आपण करून घेतलं किंवा आपल्याला भीती घालण्यात आली कि आठ दिवसाच्या आत ऑपरेशन झालं नाही तर धोका आहे. म्हणून आम्ही घाबरून करून घेतलं. बर घेतलं करून पुढे काय ??? खरच आपण हृदयरोग मुक्त झालो का ????
            खरच मला भविष्यात हृदय विकार होणार नाही का खरच मला अटॅक येणार नाही का ?????याच उत्तर कदाचित कोणीच देऊ शकणार नाही दिल तरी ""आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही "" असं असेल , खरंतर गॅरंटी ची अपेक्षा करणं चुकीच आहे पण पुढची दहा वर्ष मी चांगल आयुष्य जगायला पाहिजे हि अपेक्षा अगदी योग्य आहे. पण हे होत का ????
काल परवाचीच गोष्ट , असाच एक रुग्ण छातीत दखल म्हणून एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल झाला , अटॅक आला होता. रुग्ण ऍडमिट झाला सगळं झालं औषध उपचार झाले सोबत अंजिओग्राफी पण झाली. आणि त्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लोकेजेस सापडले आणि रुग्णाला त्वरित सांगण्यात आलं इनफॅकट भीती घालण्यात आली कि 8 दिवसाच्या आत प्लास्टी नाही केली तर जीवाला धोका आहे काहीहि होऊ शकत.
रुग्ण घाबरून गेला आणि त्यांनी प्लास्टी करून मोकळे झाले आणि बिंदास्त झाले आपण रोगमुक्त झालो वेळीच प्लास्टी करून घेतली म्हणून!!!आणि ती हि मोफत !!!!!
            रुग्ण घरी गेला सगळ्या गोष्टी सुरळीत सुरु झाल्या बघता बघता 3 महिने गेले आणि अचानक रुग्णाला परत छातीत दुखू लागलं रुग्ण परत ऍडमिट झाला परंत अंजिओग्राफी झाली आणि सांगण्यात आलं मागे ज्या ठिकाणी प्लास्टी केले त्याच ठिकाणी पुन्हा 3 महिन्यात ब्लॉकेजेस तयार झालेत आणि आत्ताच्या आत्ता बायपास करावी लागेल!!!
आणि त्यासोबत हृदयाचि ताकत कमी झाले सो बायपास करताना सुद्धा जीवाला धोका आहे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही!!!
रुग्णाच्या नातेवाईकांचा प्रश्न डाँक्टर मागे तुमीच सांगितलेलं कि प्लास्टी केल्यानंतर काही होणार नाही मग हे कस झालं????? उत्तर -नाही अस होऊ शकत आम्ही काही सांगू शकत नाही. रुग्ण हतबल .......सो मोफत ऑपरेशन होत म्हणून करून घेत असाल तर तुम्ही स्वताच्या जीवाशी खेळ करताय !!!
मित्रानो सांगायचं मुद्दा हा आहे कि हृदयविकार हा एक जीवनशैलीत बदल घडल्याने झालेला विकार आहे 70 % केसेस मध्ये नियमित औषध उपचार (प्लास्टी बायपास न्हवे ) आहारातील पथ्य आणि व्यायाम हे जर नियमित केलं तर आपण खूप छान आयुष्य जगू शकतो.
            असे बरेच लोक आहेत ज्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत पण ते अगदी निरोगी आहेत छान आहेत कारण त्यांचा आहार व्यायाम आणि औषध ..
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि ब्लॉकेजेस या चरबीच्या गाठी असतात रक्ताच्या नाही , आणि अटॅक हा रक्ताच्या गुठळी मूळे येतो जो ब्लॉकेजेस नसलेल्या व्यक्तीला हि येऊ शकतो. अगदी मलासुद्धा जर मी नियमित व्यायाम आहारातील पथ्य सांभाळली नाहीत तर !!!!!
             व्यायामाचा अभाव आहारातील अपथ्य आणि मधुमेह या तीन गोष्टी हृदयरोगाला कारणीभूत आहेत या गोष्टींमुळेच रक्तवाहिन्यातील आतला स्तर खराब होऊन तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो ब्लॉकेजेस बनु शकतात ...
            जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर नियमित व्यायाम निदान रोज पहाटे अर्ध्या तासात 3km चे चालणे आणि आहारातील पथ्य हे सांभाळावे या गोष्टी कारण खूप गरजेचं आहे .
आणि जर तुम्ही हृदयरोगी असाल तर प्लास्टी बायपास पेक्षा नियमित व्यायाम आहारातील पथ्य औषध आणि पंचकर्म या गोष्टी तुम्हाला चांगलं आयुष्य (quality life) जगायला नक्कीच मदत करू शकतात.
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
Ast. Professor at Late Kedari Redekar Ayurvedic Medical College And Research Institute and Chief Medical Officer at Amrutwel Ayurved Panchakarma Hospital
एम.डी. पंचकर्म
9823347244

No comments:

Post a Comment

Visit Our Page