Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, January 30, 2016

दिल की धडकन रूक न जाए


दिल की धडकन रूक न जाए
 आज ब­रयाचदा आपण ऐकतो / पाहतो किंवा वृत्तपत्रात वाचतो की ऐन तिशीत ह्दयाचा झटका आला आणि क्षणार्धात जिवनयात्रा संपली. किंवा ऐन तारुण्यात ह्दयविकार, कोलेस्ट्रॉल वाढलेले इत्यादी अनेक समस्या ! तर बघण्यात येत आहे की भारतीय तरूणांमध्ये वाढते ह्दयरोगाचे प्रमाण गंभीर समस्येचे रूप घेत आहे. पुर्वी जेंव्हा चाळीशी नंतर ह्दयाचे आजार होण्याची शक्यता असायची त्या समस्या आज विशीतल्या युवापिढीला झालेल्या दिसतात.तज्ञांच्या अभ्यासानुसार याला कारण आजची धावपळीची जिवनशैली यास शभंर टक्के कारणीभूत होय. तणाव, थकवा, प्रदुषण अशा अनेक कारणांमुळे ह्दयासारख्या महत्त्वपुर्ण अवयवाचे काम क्षणोक्षणी कठीण होत चालले आहे.
ह्दयरोगाचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तणाव होय.तणावामुळे मेंदुव्दारे ज्या रसायनांचे स्त्रवण होत असते ते ह्दयाच्या तंत्रात दोष निर्माण करू शकतात. तसेच युवावर्गात ह्दयासंबधी आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे धुम्रपान व मसालेदार तळीव पदार्थांचे अत्याधिक सेवन करणे होय. जर आपण आपल्या आहारविषयांस दुर्लक्षित करित आहात, आपल्या खाण्यापिण्याची नियमित वेळ नाही. फास्टफुड, तळीव आणि मैदयाने बनवलेले पदार्थ आपल्या खाण्यात अधिक प्रमाणात असतात तर आपण डेजंर झोनच्या खूप जवळ आहात. जर आपण कुठल्याही प्रकारचे योगासन, व्यायाम करीत नाही, वाढत्या वजनाबद्दल आपण अनभिज्ञ आहात तर केव्हांही ह्दयाचे आजार आपणांस जवळ करून घेऊ शकतील. स्थुलता आणि ह्दयरोग यांचा अगदी जवळचा संबध आहे. ह्दयविकार तज्ञानुसार जर आपल्या कबंरेचा घेर 36 इंच पेक्षा एक इंच पण जरा जास्त वाढला तर आपण वेळीच सावध झालेले बरे! कारण वाढत्या पोटाच्या आकारमानासोबत हार्ट अटॅकचा धोकासुध्दा एक - एक टक्याने वाढत जातो. जर आपण मधुमेह, उच्चरक्तदाब याने पुर्वीच ग्रस्त आहात तर ह्मदयाचे आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे. तसेच ह्दयविकार हे अनुवांशिक देखील असू शकतात. तंबाखू, धुम्रपान तसेच मदयपान हया सवयी ह्मदयरोग वाढविण्यात अग्रेसर आहेत.
बैठी जिवनशैली, उशीरा रात्री जागरण, व्यायामाचा अभाव यामुळे ह्दयघाताचे सकंट दुपटीने वाढते.
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक वाढल्यास धमन्यांच्या आतल्या भित्तीवर ही चरबी साठून राहते. धमन्यांस काठिण्यता येते. रक्तवहनाचा मार्ग संकुचित होतो. रक्तात निर्माण झालेल्या गाठी त्यामुळे अडकुन राहतात. अशी स्थिती जर हार्दिक धमनी ह्दयाला रक्तपुरवठा करणारी धमनी मध्ये निर्माण झाली तर परिणाम ह्दयाघात !
ह्दयरोगाचे सामान्य लक्षण :-- थोडयाही पाय­या चढल्यानतंर धाप लागणे.
किंवा चालल्यास दम लागणे.
1. PREVENTION IS BETTER THAN CURE -- हे आपण नेहमीच वाचत ऐकत आलो आहे. तर ह्दयरोगापासून वाचण्याचा हाच उत्तम उपाय, कुठल्याही व्याधीच्या उपचारापेक्षा त्याचे प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक उत्तम ! त्यासाठी --
नियमितपणे आपल्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेणे..उदा. रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल लेव्हल, शुगर लेव्हल, स्ट्रेस टेस्ट, इसीजी.
2. तणावापासून बचाव करण्यासाठी रोज 45मि. व्यायाम करणे. सोबत 15 ते 20 मिनिटे ओमकार,प्राणायाम ध्यान चा देखील अभ्यास करणे.
आहारातील तेल, तिखट, मसाला, साखर, मैदा, मिठ अत्यंत कमी करणे. घरी बनवलेले तूप घेण्यास हरकत नाही.
3. तसेच फळे, पालेभाज्या, फळभाज्या, हिरवे मुंग यांचे प्रमाण आहारात वाढविणे.
अध्यात्मिक वाचनात रूची वाढविणे.
4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक वजन असल्यास वजन कमी करणे खूप गरजेचे ! त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तज्ञांच्या सल्ल्याने करणे. आयुर्वेदीय उपचारांमुळे वजन तर कमी होतेच. पण त्यासोबत शरीरात साठलेली घाण (असे दोष ज्यामुळे भविष्यकाळात व्याधी होऊ शकतात) बाहेर निघते. सर्व शरीराचे शुध्दीकरण होते. त्यामुळे शरीराचा निसर्गत: स्टॅमिना वाढतो, असलेले आजार नियंत्रणात येतात किंवा भविष्यात व्याधी होत नाही.
5. सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे शरीररूपी गाडीची वेळोवेळी आयुर्वेदीय पचंकर्माच्याव्दारे सव्र्हीसिंग आवश्यक होय. जसे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण तसेच ह्दयधारा व ह्दयबस्ती..ज्याने आपले शरीर परत नव्याने फुलत जाऊन शारीरिक क्षमता वाढत जाईल. पचंकर्माचे फायदे वाचण्यापेक्षा स्वत: अनुभव घेऊनच त्याचा आनंद घेणे अधिक श्रेष्ठ !!
ह्दयासाठी सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे प्रेम.....प्रेम घेणे व घेण्यासाठी आधी देणे तरच ह्दयाचे निश्चित मग निरोगी राहणे.
धन्यवाद ।
 इति शुभम् ।।
 डॉ. सौ. कविता पवन लड्डा
 लातूर
 मो. 09326511681

No comments:

Post a Comment

Visit Our Page