Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, February 4, 2016

रक्त बिघडवणारी कारणे.

रक्त --आयुर्वेदीय विचार 🌺
रक्तं सर्वशरीरस्थं जीवस्याधारमुत्तमम्| स्निग्धं गुरू चलं स्वादु विदग्धं पित्तवभ्दवेत्|| सार्थ भावप्रकाश
आयुर्वेदीय शास्रानुसार रक्त सर्व शरीराचा आधार जीवन आहे. गुणधर्मानुसार स्निग्ध (स्नेहयुक्त), गुरू (जड), चल (गतिमान), स्वादु (गोड) बिघडल्यानंतर पित्ताप्रमाणे दुषीत होते....
रक्त बिघडवणारी कारणे.
१.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण high alcohol level hard drinks चे सेवन करणे
२.अतिनमकीन पदार्थांचे सेवन करणे, अतिआंबट पदार्थांचे सेवन करणे, अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाणे, तिळाचे तेल खाणे, उडीद दाळ अधिक खाणे ही देखील रक्त बिघडवणारी कारणे आहेत...
३.दही दह्यावरचे पाणी, विरूध्द आहार सेवन करणे, सडलेले दुर्गंधीत पदार्थांच्या सेवनाने, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपल्याने, अतिरागावणे, अति उन्हात फिरणे, आगिजवळ काम करणे, उलटी आदींचा वेग रोखल्याने specially नेहमी antaacid खाणे,मार लागणे, शारीरीक व मानसिक संतापाने, पुर्वीचा आहार पचला नसताना पुन्हा जेवन करणे आदी कारणामुळे देहाचा मुळ रक्त बिघडते...
शुध्द रक्त निर्मातीसाठी
शरीरात शुध्द चांगल्या प्रकारचे रक्त निर्माण होण्याकरिता शास्रकारांनी देशसात्म्य, काळसात्म्य आणि ओकसात्म्य यांना अनुसरण सम्यक आहार तथा आचरण विधीच्या पालनाने शुध्द रक्त निर्माण होते.
१. ज्या देशात आपण राहतो तेथेच उत्त्पन्न होणारे धान्य वापरणे.जसे कोकणात भात आणि आपल्याकडे गहु ज्वारी बाजरी ईत्यादी.
२. काळानुरूप आहार घेणे उदा.उन्हाळ्यात आंबे पन्हे लिंबु सरबत घेणे. रूतुचर्या नुसार आहार विहाराचे पालन करणे.
३.व्यसनी पदार्थांचा त्याग करणे किंवा त्यांच्या आहारी न जाणे.
अशा विधीचे पालन केल्यानंतर तयार होणारे शुध्द रक्त बलवर्धक , वर्ण सुधारणारे, सुख आरोग्यदायक, दीर्घायुकारक असते.....
रक्तवाढीचे कृत्रिम उपाय परिणाम
शरीरातील रक्त कमी झाले असता blood transfusion इतरांचे रक्त घेण्याचा एक उपाय केला जातो. तसेच रक्ताच्या पेशीही शरीरात चढविल्या जातात. तात्कालीक स्वरूपात त्यांचे काम होते. पण त्याचे परिणाम शरीरावर दीर्घकाल दिसतात. इतरांचे रक्त पेशी शरीरात सहज सात्म्य होत नाहीत. Splenomegaly प्लीहावृध्दी ताप, शरीरातील रक्ताचे अवयावांच्या कामात बिघाड नंतर काही दिवसांनी दिसतो. रक्ताचे काम कृत्रीम विषाप्रमाणे शरीरात होते. अत्यावश्यक अवस्थेतच गरज असताना कृत्रीम उपाय blood transfusion आदी उपयुक्त प्राणाच्या रक्षणाकरिता..
रक्तदुषीत होऊ नये याकरिता वरील रक्ताच्या बिघाडाची कारणे टाळता येतील.
तसेच शुध्द रक्त निर्मिती करिता निसर्ग रूतुचर्या दिनचर्यानुसार आहार करता येइल...
प्रकृती सारता दशविध परिक्षण नजिकच्या वैद्याकडुन करावे व आहार विहाराचे योग्य मार्गदर्शनही घ्यावे....

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page