Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, May 16, 2016

अन्नरूपी इंधन

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
   🍜🍲  अन्नरूपी इंधन 🍧🍨
बलमारोग्यमायुष्य प्राणाश्चाग्नौ प्रतिष्ठिताः |
अन्नपानेन्धनैश्चाग्निर्ज्वलति व्येति चान्यथा  || च.सु.
शरीराचे बल, आरोग्य, आयुष्य, प्राण हा जाठराग्नि (भुकेवर), पर्यायाने अन्नपानरूपी मिळणारया इंधनावर अवलंबुन असतो. जाठराग्निला चांगले इंधन (अन्नपान) मिळाले तर बल आरोग्य आदींची प्राप्ती होते अन्यथा बल आरोग्य आदींचा क्षयच होतो....
समजण्यासाठी काही उदाहरणे👇​👇​👇​
१. रोज 90, 180 घेणारया लोकांत शुक्र ओजाच्या विरूध्द गुणात्मक असलेले मद्य (दारू) शरीरातील शुक्र ओज कमी करून बलनाशच करेल यात शंका नसावी..
   2. रोज २-३ तोटे तंबाखु सेवन करणारया लोकांत तंबाखु सेवनामुळे शरीरात वायु अत्याधिक प्रमाणात वाढतो सोबतच ओज शुक्र बल यांचा क्षयही होतो तो वरचेवर वाढत जातो.
        3.  नेहमी विरूध्द अन्न खाणारया लोकांत शरीरातील तयार होणारे रक्त दुषीत तयार होते असे दुषीत रक्त ह्रदय मेंदु ते त्वचा अशा सर्वच अवयवांना पुरविले जाते रोजच्या विरूध्द अन्न सेवनाने मज्जावह स्रोतस ( nervous system) चे आजार, ह्रदयाचे आजार, सर्व प्रकारचे त्वचाविकार निर्माण होतात. विरूध्दान्नसेवन टाळल्याशिवाय कुठलाही आजार पुर्णपणे टाळला जात नाही. कारण ज्या आहाराने त्रास होतो तो बदलला जात नाही.
          4. रोज शिळे अन्न खाणारे फोडणीचा भात, दोनवेळा गरम केलेले अन्न करून खाणारयांत अर्धडोकेदुखी, पोटरया दुखणे, तीव्र सांधेदुखी असे त्रास होतात. शिळे टाळल्याशिवाय कुठलाही त्रास कमी होत नाही रोज pain killers खावे लागतात.
             याऊलट आहारात दुध तुप गहु ज्वारी तांदुळ साळीच्या लाह्या फळभाज्या रूतुनुसार मिळणारी फळे अशा हितकारक आहाराचा नित्य वापर असेल तर बल आयुष्य आरोग्य आदींची प्राप्ती होते.
         जिभेचे लाड अहितकर पदार्थांनी पुरविले तर मग मात्र जाठराग्नि भुकेला अहितकारक पदार्थ पचवुन तयार होणारया  अहितकारक अाहारसाद्वारे शरीराचे पोषण करावे लागते. अशा अहितकारक आहाररसापासुन बल, आरोग्य, आयुष्य प्राप्त होणारच नाही कारण शरीरातील सप्तधातु व अवयव कमकुवतच बनत जातात..
          आयुर्वेदीय शास्रात आहाराला महत्व देण्याचे कारणच हे आहे. जो व्यक्ती हितकारक आहार विहार करेल तो निश्चितच निरोगी राहील.  नाहीतर वाढत्या वयानुसार कायम स्वरूपी टिकणारया रक्तदाब, मधुमेह, thyroid, सांधेदुखी, ह्रद्रोग या सारख्या आजारात anti ....drugs ते ... replacement, transplant करणे सारखे कृत्रीम उपाय वारंवार करावे लागतील कारण कृत्रीम उपाय शरीरासाठी सहजसात्म्य कधीच नसतात. याकरिता वेळीच जवळच्या वैद्याकडुन प्रकृति तपासुन आहार विहार पंचकर्माचा सल्ला घ्यावा आणि त्रास सुरू होण्यापुर्वीच टाळण्यासाठी प्रयत्न करावेत...
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
(For what's up post send your request messege on above mob no )

No comments:

Post a Comment

Visit Our Page