Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, June 18, 2016

मुळव्याध

Piles...मुळव्याध ।।।

अर्श म्हनुन आयुर्वेदात ओळखला जानारा आजार..
बरेच प्रकाराने सजलेला व विविधतेने नटलेला हा आजार..
कधी रक्त पडते,कधी गुद द्वाराच्या ठिकानी वेदना होतात,तर कधी बसता येत नाही।

अशा व अनेक कारने घेवुन रुग्न चिकित्सालयात येतात
नाडी परिक्षन केल्यानंतर दरवेळी वात व पित्त हे दोन दोष नेहमीच सोबत ह्या ठिकानी वास्तव्य करतांना दिसतात तर कधी कफासह सुज उत्पन्न करतात ।

पन हे दोष आपल्या मुळ जागेला सोडुन ह्या ठिकानी स्थान संश्रय का बरे करतात,कोन आणत ह्यांना ह्या ठिकाणी..!!

अर्श रक्त मांस धातुगत आजार व गुदद्वार व गुदनासिका ह्याच्या वलीमध्ये होनारा ,त्वचा व मांस ह्या धातुंना दुष्ट करनारा,
घडाळ्याच्या आकड्याप्रमाने वेगवेग्ळ्या स्थानांमध्ये होनारा,

गुदाच्या मल विसर्जन करने ह्या कार्यात अडथळा निर्मान करनारा हा आजार।।

काहींना जन्मापासुन वा त्यानंतर होतात।।

तर कधी रक्तस्त्राव युक्त तर कधी कोरडे मोड युक्त ।।

तर कधी अत्यंत वेदनायुक्त संपुर्न शरीराला त्रास दायक ,मलावष्टंभ करनारे,बलहानी व इतर इंद्रियाॉनामध्येही बिघाड आननारे असे मोड असतात..!!

तर कधी लालसर,स्पर्श केला की गरम लागनारे,स्राव युक्त,असे काही असतात,ताप उत्तपन करनारे काही मोड असतात.!

तर काही बेरट असतात,कठीन असतात,सर्दि ला पडस्याला सोबत घेवुनच असतात,
तेथे खाजही येते ,हे मोड खरतर रक्त व मांस धातुपासुन तयार होतात  व कफासहीत सुज उत्पन्न करतात

गुदद्वाराच्या ठिकानी तीऩ वली (spincters )असतात,जे मलाला धरुन ठेवने व योग्य वेळी बाहेर काढन्याचे कार्य करतात त्यानुसार,

आतली पहिली वली प्रवाहीनी,

            दुसरी म्हनजेच मधली विसर्जिनी

            तिसरी संवहरणी अश्या तिन वली व शेवटी गुदोष्ट (Anus.)

त्यामुळे ह्या वलीमध्ये सतत होनार्या मलाच्या अपक्व वा खडेयुक्त संचयामुळे वलीमधील कार्यक्षमता कमी होते व त्या रक्त व मांसल धातुपासुन तयार होतात
 व तेथे ह्या मलाच्या संचय वा वातप्रकोपक विहार व आहारामुळे, त्यात कठीनजागी बर्याच वेळ बसने,अवेळी जेवन,कमी पानी घेने,योग्य आहार न घेने,वेगाचे अवरोध म्हनजे मल मुत्राचा अवरोध
तसेच काहींना अनुंवशिक असतो
तर काही स्रीयांना प्रसुतीनंतर होतो,

वलीमध्ये होनारे मोड हे कधी आतल्या बाजुने असतात
कधी त्रास देतात तर कधी देत नाहीत

कधी कधी हे मोड शौचाला गेल्यांनतर सुजुन बाहेर येतात व परत आत जातात तेव्हा शौचाला फार त्रास होतो

कधी हे मोड बाहेर आल्यावर आत जात नाहीत।।
कधी स्राव होतो,खाज ही येते
ह्या सर्वाचा दोषांनुसार भेद करुन चि करता येते

तर कधी हे मोड बाहेरच गुदोष्ठाच्या ठिकानी तयार होतात,वेदनायुक्त,स्रावी वा कंडु ( खाज ) युक्त असतात

वारंवार खडे युक्त मलप्रवुत्तीमुळे म्हना वा फार जोर दिल्याने म्हना वली वर आघात होवुन जखमा होतात,चिरा पडतात त्याला परिकर्तीका म्हनतात वा fissure म्हनतात,त्यास ही दोष भेदाने चि करता येते
व ते पुर्न बरे होतात।।

बर्याच वेळेला रुग्न हा
त्रासलेल्या अवस्थेत येतो,
डॉ मला मुळव्याध आहे,बसता येत नाही फार दुखते काहीतरी करा पन मला बरे करा।।

ह्यांचा व्यवसाय व वय हे नेहमीच आयुर्वेदिक चिकित्सेत महत्वाचे आहे

मी ड्रायवर आहे,टेलर,माळी फुले हार बनवनारा,बसुन काम करनारे मग काही इंजिनिअर पन व डॉक्टरीपेशातील सुध्दा..

काय चुकते  ह्यांचे जो हा महाभंयकर आजार उद्भवतो.. म्हनुन काही वेळा Sitter disease म्हनुन विनोद म्हनुन म्हनतो।।

शरीरात प्रत्येक स्त्रोतस म्हनजेच प्रत्येक system एका अग्नीवर वा पेट्रोलवर काम करत असते तो अग्नीच जर मंदावला तर system रुपी गाडीही मंदावते व हळुहळु काम काढते तसेच शरीराचे आहे,

योग्य वेळी शरीराकडे लक्ष देने गरजेचे आहे,मलाच्या दुष्टीमुळे परिनामी पचन संस्थेतेच्या बिघाडामुळे परिनामी पचनास सहायभुत अग्नी जाठराग्नी मंदावल्यामुळे ,पचनाच्या चलन वलन करन्यास सहायभुत वायु समान व व्यान ह्याच्याही बिघाडामुळे अन्न पचन सुरळीत होत नाही,परिनामी मल व मुत्र ही व्यवस्थित तयार होत नाही,हाच व्यान वायु न समान वायु मंदाग्नीमुळे रक्त व मांस धातुची दुष्टी करुन अपान वायु जो मल मुत्र आर्तव ह्याचे धारन व विसर्जनाचे कार्य करतो त्याला ही दुष्ट करुन मलाच्या विसर्जनास अडधळा निर्मान करतो...

पन हे आपोआप तर नाही होत,

अवेळी जेवन,कित्येक तास बसुन काम करने,आळस आला तर दिवसातुन १० ते १२ वेळा चहारुपी बिनकामाचे अम्रुत पिने,
पर्यायी पानी कमी पिने,
शिळे अन्न खाने,गाडी वरुन प्रवास अत्यंतिक करने,वेगाचा अवरोध करने म्हनजे मुत्र प्रवुत्ती आल्या नंतरही रोखुन धरने तसेच मलाचेही..
स्त्रियांच्या बाबतीत तसेच ,
डिलीवरी नंतर बर्याच स्रियाॉमध्येही त्रास जानवतो...

सुरवात ही पोट फुगने,पोटर्या दुखने,पोट साफ न होने ,परिनामी भुक कमी लागने,करपट ढेकर,पोटात दुखने  आणि ह्या सर्वाचा
परिनाम हा मनावरही होतोच।।

रक्ताची दुष्टी असली की मनाची हा दुष्टी होते,चिडचिड,राग उत्पन्न होतो

पु ल देशपांडे ह्यांना एकदा विचारले,तुमचा आयुष्यातील एखादा चांगला प्रंसग वा दिवस कोनता?

ते म्हनाले ज्या दिवशी माझे पोट साफ होते तो दिवस माझा परमानंदाचा!!! विनोद राहुद्या पन हे सत्य आहे ।।

तसेच सुरुवातीलाच लक्ष देने गरजेचे आहे,

लक्ष देने म्हनजेचे टिव्ही वरील वा वर्तमानपत्रातील जाहीरातीकडे नाही तर योग्य त्या वैद्याकडे  जावुन सल्ला घेने महत्वाचे।।

(उगाच आयुर्वेदाचा दुष्परिनाम होत नाही म्हनुन दुकानातुन,वा औषधी विक्रेत्याकडुन घेवु नये,कारन योग्य ते औषध न घेतल्याने तो आजार ठिक न होता जास्त बळावत जातो व त्यामुळे उपचार करतांना ही बर्याच अडचनी येतात तो विषय वेगळा आहे)

वेैद्याच्या सल्ल्यानेच घ्या।।
तसेच
सुरुवातीलाच जर चिकित्सा योग्य ती घेतली तर तो आजार समुळ नष्ट होतो,
आजाराला त्याच्या सुरुवातीलाच जिंकावे असे म्हनतात पन रुग्न शेवट पर्यत स्वत : एकटाच लढत असतो,व शेवटी हार पत्करुन जेव्हा येतो तेव्हा लगेच बरे करा म्हनतो,

स्वत: ३ ते ६ महिने अंगावर काढले ना त्यापेक्षाही जास्त व मला उद्या पर्यत बरे वाटेल असे करा..

पन रुग्नाला शरीर का बिघडले हे समजावुन सांगीतले की तो मग एकतो तसेच ,

मित्रांनो अर्श हा अाजार आपल्याला आहे तर लवकर त्याची चि करने गरजेचे नाहीतर त्या आजाराला धरुन इतरही आजार आपले डोके वर काढतात,

उदा,लघवीचे आजार, भंगदर fistuala ,परिकरतीका fissure व उदावर्त म्हनजे पोट साफ न झाल्याने वायु उध्व गत होवुन पोट फुगी,दम लागने,छातीत दुखने अशे आजार उ्भवतात।।

चिकित्सा

औषधी चिकित्सा व पंचकर्म चिकित्सेने हा आजार पुर्न बरा होतो पन शरीराची काळजी ही आपन घेनेही तेवढेच महत्वाचे आहे ,आपन काय खातो हेही पाहने फार गरजेचे आहे

चांगल्या पालेभाज्या,सुरन,ताक तसेच ताजे अन्नाचा वापर व योग्य वेळी जेवन( मी माझ्या मागील लेखात दिनचर्या सागीतली आहे ते पहावे।।) व पान्याचा योग्य वापर करने..!!

जेवन करतांना शांत व जेवनाचा आनंद घेवुन जेवन करने
ही गरजेचे आहे..
जेवतांना कमी पानी घ्यावे व जेवन झाल्यानंतर २० -३० मि पाणी घ्यावे

जेवल्यानंतर थोडेसे चालने

तसेच अति तिखट ,अतिआंबट ,शिळे अन्न ई वापर कमी प्रमानात करने

चहा काँफी हे दाहक पदार्थ कमी प्रमानात आहारात घेने,त्यापेक्षा कोंधबीर सैधव युक्त ताक घ्यावे,ताकासारखे दुसरे औषध नाही,
तर कधी फळाचा रसही घ्यावा,
सुरनाची भाजी व त्याचा वापर करावा

पाव,ब्रेड असे पदार्थ टाळावेत,

फळ केळ,डाळिंब,जांबुळ,अंजिर ,मोसंबी ज्युस ई फळाचा वापर ठेवावा

पालेभाज्या वापर करावा पन त्या योग्य धुवुन ,तपासुन घ्याव्यात
वा त्याचे सुप बनवुन ही द्यावे

आहारात तुपाचा( गाईच्या ) वापर नियमित करावा

कधी कधी मोड एवढ्या प्रमानात असतात की गुदद्वारही दिसत नाही व वेदना ही प्रंचड प्रमानात असतात,मनाची दुष्टी होते व असह्या होते रुग्नाला,त्यावेळी औषधी चि व आराम व योग्य औषधी आहार,कधी कधी संपुर्न दिवस औषधी ताकावरच राहावे लागते,जाठराग्नी जेवढा दिपन होईल तेवढ्या लवकर हे मोड लहान होतात,

दिरंगाई व दुर्लक्ष केल्यास व योग्य वेळी चिकित्सा न केल्यास
शस्त्र क्रिया करुन ते मोड काढुन टाकावे लागतात
पन मोड काढल्यानंतरही जर रुग्नाने आपला आहार व विहार बदलला नाही तर चे पुन्हा उत्पन्न  होतात...!!

औषधी चिकित्सा,पंचकर्म बस्ती चिकित्साने हा आजार पुर्न बरा होतो पन रुग्नाने योग्य वेळी शरीराची काळजी घेने गरजेचे आहे..!!

आपन जसे आपल्या महागड्या मोबाइलची ,महागड्या गाडीची काळजी घेतो तसेच सर्वात महाग अशा शरीराचीही काळजी घेने महत्वाचे आहे...!!!

आयुर्वेद सर्वांसाठी..!!

धऩ्यवाद

वैद्य सचिन भोर
ठाणे।।
साईनाथ आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
dr.Sachin_bhor@yahoo.com
9821832578/8451023643.

No comments:

Post a Comment

Visit Our Page