Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, June 2, 2016

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

         *अन्नपचन* भाग 3

अन्नपचन होण्यासाठी आणखी एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, ती म्हणजे मनाची शक्ती.

मन प्रसन्न असेल तरच खाल्लेलं अन्न अंगाला लागते, नाहीतर अनेकजण असंच सांगतात,
 "हा खातो खूप, पण मेलं जातं कुठे कळतच नाही."

पैज लावून जेवणारे अनेक जण असतात.
( म्हणजे होते, कारण आता पैज लावून जेवणे सोडाच, त्या कोलेस्टेरॉलच्या राक्षसाच्या भीतीपोटी मनसोक्त, पोटभर समाधानाने दोनवेळचं जेवता सुद्धा येत नाही.)

जिलब्या असोत किंवा लाडू, गुलाबजाम असोत वा श्रीखंड.
बरोबर पट्टीचा खाणारा असेल, आग्रह करकरून वाढणारी असेल,  तर खाण्यातली मजा काही औरच असते.

असं मनापासून ठरवून खाल्लं तर पाच पन्नास जिलब्या, एकदीड किलो श्रीखंड, साठ सत्तर गुलाबजाम असे सहज संपवणारी माणसे मी पण बघीतली आहेत.

असे खाणारी,  खाऊन पचवणारी ही माणऽसे गेऽऽली कुठे ? ?

गेले ते दिवस,
उरल्या त्या आठवणी
आणि
आता असे ऐकूनही
पडत नाही पचनी...

फाईल वाढवीत जायची
रक्ताच्या रिपोर्टस् ची,
दूरवर दिसत नाही
चाहुल आरोग्याची !!

आयुष्यभर मात्र,
 न चुकता औषध खात रहायची
वेळ आली बाकी काही
शिल्लक राहीलं नाही म्हणायची

कसं पचत असेल? एवढं खाऊन,
त्रास कसा होत नव्हता त्यांना ?
आम्ही मात्र अर्धी वाटी अळवाचे फतफते खाल्ले तरी बाधते हो आम्हास...
अश्या मुळमुळीत प्रकृत्या कशा बनल्या आताच्या जमान्याच्या...

कारण एकच,
मनाची शक्ती.
ज्यांनी ठरवले, त्यांनी पचवले !
नाही ठरवले, त्यांना नडले !!

याशिवाय दुसरं काही मिळणारच नाय्ये, अशी धारणा जेव्हा मनाची असते, तेव्हादेखील सगळं सहज पचून जाते. म्हणजे मनाचा पचनातील सहभाग तेवढाच महत्वाचा असतो.

समोर जे आहे, ते शांतपणे, समाधानाने, अन्नाची निंदा न करता खाल्ले तर पचन सुलभ होत असते.

भीती बाळगून खाल्ले तर सोन्याची पण माती होते, आणि भीती न बाळगता खाल्ले तर "तो" खाल्लेल्या मातीचे पण सोने करतो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
03.06.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

Visit Our Page