Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, October 29, 2016

व्यायाम

🍀 🍀

  स्निग्ध आहार (तुपतेलयुक्त) आहार घेणारया लोकांनी व बळकट लोकांनी थंडीच्या काळात व वसंत रूतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. व इतर काळात म्हणजे  पावसाळ्यात व उन्हाळ्यात शरीराचे बल कमी असल्याने अल्प व्यायाम करावा किंवा व्यायाम करू नये.
व्यायाम आणि मेहनत (exertion) यात basik फरक आहे. व्यायाम हा शरीराचे बल वाढवतो तर exertion मुळे शरीराची झीज होते..
          अतिव्यायाम केल्याने तहान लागणे क्षय  दम लागणे रक्तपित्त शरीरातील विविध opening मधुन रक्त पडणे थकवा दुर्बलता खोकला ताप वांती हे विकार उत्पन्न होतात.                                 त्यामुळेच काळानुरूप तुप तैल आदींनी युक्त स्निग्ध आहारासह अर्धशक्ति व्यायाम करावा. स्निग्ध आहाराचा समावेश नसताना केलेला व्यायाम शरीराची झीज घडवुन नुकसान करतो..

🍀 व्यायामाचे लाभ 🍀

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं दुःखसहिष्णुता|
दोषक्षयो ग्निवृध्दिश्च व्यायामादुपजायते|| च.सु. ७/३२

व्यायाम केल्याने शरीरास लाघवता (हलकेपणा) प्राप्त होतो.आळस दुर होतो.
कर्मसामर्थ्यं म्हणजे काम करण्याची कष्ट करण्याची क्षमता वाढते.
स्थैर्य प्राप्त होते. शारीर आणि मानस दोन्हींमध्ये स्थिरता येते. मनाची चंचलता दुर होते.
दुःखसहिष्णुता म्हणजे दुख कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते. दुःख पचवण्याची मनाची तयारी वाढते.
शरीरातील मेद विकृत कफ आदी दोष वाढले असता त्यांचा क्षय व्यायामाने होतो.
व्यायामाने अग्निमध्ये (भुकेत) वाढ होते..फक्त व्यायाम अगोदरच्या नियमानुसार स्निग्ध आहारासह   अर्धशक्ती रूतुनुसार करावा.म्हणजे वरील लाभ होतात.

   🍀  व्यायामाची लक्षणे  🍀

ह्रदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते|
मुखं च शोषं लभते तब्दलार्धस्य लक्षणम्||
किंवा ललाटे नासायां गात्रसंधिषु कक्षयोः|
यदा संजायते स्वेदो बलार्धं तु तदा$$दिशेत्||

बलार्ध लक्षण--- व्यायाम केल्यानंतर जेंव्हा ह्रदयातील वायु मुखात येत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तेंव्हा बलार्ध (शक्तीच्या अर्धा व्यायाम झाला समजावे.
          किंवा व्यायाम केल्यानंतर जेंव्हा कपाळ, नाक, सांध्याचे ठिकाणी तसेच काखेत घाम येत असेल तेंव्हा आपल्या ताकदिच्या अर्धा व्यायाम झाला असे समजावे.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no _ 9130497856, 9028562102

Friday, October 28, 2016

धन्वंतरी रूप – एक चिंतन

आज धन्वंतरी जयंती! आरोग्य शास्त्राच्या देवतेचा दिवस!

#hindu_god_of_medicine

केवळ आपल्या भारतीय परंपरेतच नाही तर प्राचीन ग्रीक संस्कृतीत सुद्धा प्रत्येक गोष्टीची देवता नेमून दिलेली असायची. प्रत्येक देवतेचे स्वरूप ठरवताना त्यामागे एक सखोल विचार असायचा. एका अव्यक्त शक्तीचे मूर्त स्वरूप कुणी आणि कसे ठरवले असा मला नेहेमी प्रश्न पडायचा ......गणपतीचे रूप असे ठराविकच का? शंकराच्या जटा, त्याचे नील स्वरूप, भस्म विलेपित त्याची काया, असेच त्याचे स्वरूप का? किंवा आपल्या दुर्गा देवीचे दहा हातांमध्ये दहा गोष्टी असेच स्वरूप का? या मागील पौराणिक कथांचा भाग सोडला आणि नीट चिंतन केले तर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौतिक रूपाची कल्पना येते.

आयुर्वेदाला प्रवेश घेतल्यावर “धन्वंतरी” देवतेचा पहिला परिचय झाला. मूर्ती पूजेत फारसे स्वारस्य नसल्याने थोडीफार “विष्णू” सारखी देवता एवढीच नोंद तेव्हा मी घेतली. समुद्र मंथनातून आलेल्या “आयुर्वेदाचे” जसजसे वैचारिक मंथन सुरू झाले तसतसे “धन्वंतरीच्या” स्वरूपाबद्दल ओढ वाटायला लागली. या मूर्त स्वरूपाची रचना अशीच का? याबद्दल जागृत झालेल्या ‘जिज्ञासेमुळे’ अनेक कोडी उलगडली. आपल्या शास्त्रावरचा विश्वास अधिक दृढ झाला.

भगवान विष्णूप्रमाणे रचना असलेल्या धन्वंतरीच्या चारही भुजांमध्ये शंख, चक्र, जालौका आणि अमृतघट अशा ४ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी याच क्रमाने का आल्या असतील या मागे देखील खूप शास्त्र आहे. ही रचना मुख्यत: रस-रक्त परिभ्रमण ( circulation)  सूचित करणारी आहे.

बघा हं…….

देवाचे मूर्त स्वरूप हे ‘हृदयाचे’ प्रतिक आहे अशी कल्पना करा. चार हात जणू हृदयाचे चार कप्पे आहेत. वरचे दोन आलिंद – atrium आणि खालचे दोन निलय - ventricle. हृदयातून निघालेले रक्त सर्व शरीरात फिरून पुन: हृदयात प्रथम उजव्या आलिंदात—right atrium मध्ये येते. फिरून पुन: त्याच जागी येणे या गतीला “चक्रवत” म्हणजेच circulatory म्हणतात त्याचेच प्रतिक म्हणून या कप्प्यात “चक्र” आले.

आता हे फिरून पुन: शुद्ध होण्यासाठी आलेले रक्त त्याच्या खालच्या कप्प्यात उजव्या निलायात—right ventricle मध्ये येते. इथून रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे जाते. अशुद्ध रक्त पिऊन रक्त शुद्ध करणाऱ्या जळवा या रक्तशुद्धीच्या प्रतीकात्मक म्हणून येथे आल्या.

फुप्फुसामधून शुद्ध रक्त डाव्या आलिंदात—left atrium मध्ये येते.
अर्वाचीन शास्त्रानुसार, शुद्ध रक्त left ventricle मधून महाधमनी (aorta) द्वारे पुन: सर्वत्र फिरत राहते. परंतु येथे एका महत्वाच्या बाबीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, जे आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी आपल्या थोर ऋषीमुनींनी करून ठेवलेय! सृष्टीतील कोणत्याही पदार्थाचे सेवन आपण करतो तेव्हा आपले शरीर, मन आणि इंद्रिये ते तसेच स्वीकारत नाही. ते सात्म्य होण्यासाठी, शारीरादि भावांमध्ये त्याचे रूपांतर होण्यासाठी योग्य ते संस्कार होणे गरजेचे असते. जसे आहारावर “पाचक अग्नि” संस्कार!

या specific बाबतीत आकाश आणि वायू महाभूतांचे शब्द-स्पर्श-गुण भूयिष्ठ संस्कार या शुद्ध रक्तावर होतात. तेव्हा जी नादोत्पत्ती होते त्यालाच व्यवहारात हृदयाचे ठोके अथवा दिल की धडकन, अथवा लब-डब heart sound म्हणतात. शब्द अथवा ध्वनी यांचे प्रतिक म्हणून या डाव्या कप्प्यात “शंख” आले आहे.

अर्वाचीन शास्त्रामध्ये respiratory system  मध्ये नाक, pharynx आणि फुप्फुस हे अवयव येतात. तर आयुर्वेदानुसार “अंबरपियूषाचा – oxygen” चा स्वीकार जरी फुप्फुसात होत असला तरी त्याला जीवनीय गुणांनी युक्त करण्याचे काम हे हृदयात होत असल्याने प्राणवह स्रोतासाचे मूळ, फुप्फुस न सांगता, हृदय सांगितले आहे.
आता असे हे शुद्ध्योत्तर  संस्कारित रक्त त्या व्यक्तीस सात्म्य झाल्याने सर्व पेशींना जीवनीय झाल्याने अमृतासमान आहे. असे हे अमृतासमान रक्ताचे धारण डाव्या निलयात— left ventricle होत असल्याने या कप्प्याचे प्रतिक ‘अमृतघट’ आहे.

‘मंथन’ या प्रक्रियेत खरोखर खूप गवसते. या मूर्त स्वरूपामागील  कारण मीमांसेने माझा आयुर्वेदावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला. याचे ग्रंथोक्त शास्त्रीय विवेचन कुठेही आलेले नाही. (काही वैद्य मंडळी आधी हेच विचारतील म्हणून आधीच सांगितले). “हे असेच का?” या जिज्ञासेपोटी  निर्माण झालेला  logical  विचार आहे.

समुद्रमंथनातून निरोगी जीवसृष्टीसाठी आयुर्वेद शास्त्र घेऊन आलेल्या “भगवान धन्वंतरी” यांचा आशीर्वाद चराचर सृष्टीला निरंतर लाभत राहो, ही प्रार्थना!!!

जय भगवान धन्वंतरी!

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन
९७६४९९५५१७

Tuesday, October 18, 2016

स्त्रियांत आजाराची कारणे

🍀 स्रियांत आजारांची कारणे 🍀

विरूध्दमद्याध्यशनादर्जीर्णादगर्भप्रपातादतिमैथुनाच्च | यानाध्वशोकाद्तिकर्षणाच्च भाराभिघाताच्छयनाद्दिवा च||                    वंगसेनस्रिरोगाधिकार

स्रियांत विरूध्द अन्न उदा. दुध+मीठ, मुगाची खिचडी+ दुध, शिळे वा दोन वेळा गरम केलेले अन्न आदी विरूध्द अन्न व विरूध्द क्रिया फ्रीजचा वापर केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात.
            पुर्वीचे अन्न पचले नसताना देखील पुन्हा जेवन केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात. जेवन केल्यानंतर पुन्हा पहिल्या ३ तासात काही खाऊ नये व ६ तास काही खाल्ल्याशिवाय राहु नये.
         नेहमी अजीर्ण होत असेल तर स्रियांचे विकार उत्पन्न होतात. अजीर्ण होउ नये याकरिता योग्य वेळी म्हणजे भुक लागली असता हितकारक आहार घ्यावा.
           गर्भपात झाला तरीदेखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अतिमैथुनाने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अत्याधिक प्रवास दुचाकीचा अधिक वापर केल्याने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात.
    नेहमी शोक दुखामुळे देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. कर्षन करणारी कारणे नेहमी उपवास करणे, उपाशीपोटी राहणे, अवजड कामे करणे जड वजन उचलणे, मार लागणे आदी कारणांमुळे स्रियांत आजार उत्पन्न होतात.
          दिवसा जेवणानंतरची झोप आजार निर्मितीचे प्रमुख कारण स्रियांत दिसते. दिवसा झोपल्याने कफपित्तवाढुन कफपित्ताने उत्पन्न आजार डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वजन वाढने आदी आजार उत्पन्न होतात.
     वरील कारणे टाळली तर स्रियांत आरोग्य राखता येइल. सोबत काही कारणे घडली असतील आणि काही त्रास असल्यास चिकित्सा आहार विहाराचा  योग्य सल्ला जरूर घ्यावा..

      🍀रजस्वला परिचर्या🍀
    (पाळीच्या काळातील नियम)

मासिक रजस्राव सुरू झाल्यानंतर स्रिंयानी पुढील नियमांचे पालन केले असता विविध आजारांपासुन  (pcod, cyst, fibriods) दुर राहता येते......
१.झोपण्यासाठी चटईचा वापर करणे गादी वैगेरे न वापरणे...
२. शारीरीक व मानसिक हिंसा न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे..
३.सात्विक आहाराचे सेवन करावे...
४.या काळात रडणे, नखे काढणे,अंगाला तैल उटणे लावणे, डोळ्यात काजळ वा अंजन लावणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावणे, मोठे शब्द एेकणे, फार हसणे, फार बोलणे,फार श्रम करणे,भुमिखनन करणे, वारा लागेल ठिकाणी बसणे, अशा वायुला बिघडवणारया प्रकुपित करणारया गोष्टी करू नयेत...
  वरील नियम पाळावेत कारण शरीरातील वायु महिणाभरात जमा झालेले दुषीत रक्त शरीराबाहेर काढतो आणि स्रियांची शारीर शुध्दी करून आरोग्य टिकवतो.जर वरील नियम पाळले नाहीत तर वायुचा प्रकोप होतो आणि प्रकुपीत वायु दुषीत रक्ताला शरीरात पसरवुन वांग, त्वचाविकार, लठ्ठपणा, केस गळणे, pcod,fibriods, cyst.आदी विविध आजार निर्माण करतो....
    स्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रजस्रावाच्या काळात वरील नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. पाळीच्या तक्रारी ह्याच स्रिंयामध्ये सर्व आजारांसाठी कारणीभुत ठरतात.मासिक पाळीच्या छोट्या मोठ्या तक्रारींसाठी योग्य उपचार केले नाही तर भविष्यात गंभीर दुष्पपरिणामांचा सामना करावा लागतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Visit Our Page