Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, February 11, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*लाईक, कमेंट, शेअर आणि आयुर्वेद*

सोशल मिडीयाचा वापर आता आपली जनता खूप प्रमाणात करायला लागली आहे. विशेषतः तरुण मुल-मुली तर भरपूरच. राजकारण, मनोरंजन, मैत्री, आरोग्याच्या टिप्स, अभ्यासाच्या टिप्स, आध्यात्मिक टिप्स आणि प्रेमप्रकरणापासून तर थेट लग्न जुळे पर्यंतच्या घटना सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु असतात. सोशल मिडियाचा  अनेक लोक खुबीने फायदा करून घेऊ शकतात. परंतु ज्यांना नाही जमल त्यांना मानसिक पीडेतूनसुद्धा जाव लागत. आपण ह्यातून विविध प्रकारच्या लोकांशी संवाद करू शकतो, त्यांच्या विषयी जाणून घेऊ शकतो. शांती पसरविण्यापासून थेट आतंकवाद पसरविण्यापर्यंत लोक ह्याचा वापर करतांना दिसतात.

माझे फेसबुकवर १००० मित्र, मी whats app वर ३०-४० ग्रुप चा एडमीन, twiter वर ….इतके फॉलोअर्स. माझ्या प्रोफाईल पिक्चरला माहितीये १ तासात किती लाईक मिळाले ते? २०० लाईक मिळाले भाऊ आणि त्यात ३० लव पण मिळाले. तुमच्या सारख नाही फक्त १० -१२ लाईक वर गेम खल्लास. असा तोरा मिरवणारे आपल्याला दिसतातच. तर दुसरी कडे मला २ दिवस झाले पोस्ट टाकून अजून फक्त १०च लाईक एकही कमेंट नाही. झाडावर चढून स्ल्फी काढला आणि प्रोफाईल टाकला तरी फक्त एक लाईक नो कमेंट. त्याला/तिला तर भरपूर लाईक मिळतात मला का नाही मिळत? माझे मित्र मला का लाईक देत नाहीत? त्याचे ५००० मित्र माझे तर फक्त 500च मित्र. माझे मित्र का वाढत नाही? अशे नैराश्याच्या गर्तेत टाकणारे अनेक प्रश्न आजकाल सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पडत आहेत.

आपल्या वाढदिवसाचे, ट्रीपवर जाऊन केलेल्या मौज-मस्तीचे, बायको सोबत हनीमून चे, लग्नाचे, गर्लफ्रेंड सोबतचे अशे अनेक इव्हेंट्स चे फोटो फेसबुक आणि whats app वर शेयर केले जातात. हे सगळ बघून जेव्हा एखाद्याची बायको नवऱ्याला म्हणते. बघा ते कसे फिरताय, मौज मजा करताय, आपण तर कधी जाताच नाही. नवरा म्हणतो बघ तिने कशी जीन्स घातलीये तुला तर जीन्स होणारच नाही. अश्याप्रकारे ह्यातून एक प्रकारची इर्षा, द्वेष आणि कलह सुद्धा निर्माण होतो. आणि हि सगळी मौज मजा माझ्या आयुष्यात का नाही? मी एव्हडा/एव्हडी सुंदर का नाही?, मला कुणी वाढदिवसाला फेसबुक वर शुभेच्छा का दिल्या नाही? whats app वर दोन्ही रेषा कधीच निळ्या झाल्या मग उत्तर का देत नसेल बर? असे एक न अनेक प्रश्न पडून तरुण नैराश्यात जात आहेत. तसेच द्वेष , इर्षा, काम, क्रोध ,लोभ ह्या भावना मनात निर्माण होत आहेत.

फ्री वाला जिओ, ३G, ४G चे इंटरनेट प्लान, आणि प्रत्येकाकडे असलेला मोबाईल ह्यामुळे ह्याचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. सोशल मिडीयाचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याबद्दलचे अनेक संशोधन सुद्धा जगभरात सुरु आहेत. सोशल मिडिया वापरत असताना त्याचे चांगले व वाईट परिणाम आपल्यला अनुभवास येतात. सोशल मिडीयावर मिळालेले लाईक, कमेंट व शेअर हे म्हणजे आपल्यला लागलेलं चागल्या किंवा वाईट व्यक्तिमत्वाच लेबल नसते. हे लक्षात घेणे गरजेच आहे. ज्याचे फेसबुक वर १००० मित्र असतात. त्यांना आपल्या अपार्टमेंटमध्ये /गल्लीत कुणी ओळखत नाही अशीही परिस्थिती कधी कधी बघयला मिळते, आणि जे फेसबुक वर नाहीत अश्यांना सुद्धा जग ओळखते आणि त्यांचेही अनंत चहाते असतात.

ह्यासाठी आयुर्वेदाने आधीच सांगून ठेवले आहे  कि,  ज्यांना इह लोकी स्वतःचे भले करून घ्यायचे आहे त्यांनी कठोर बोलणे, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे, चुगली, लोभ, इर्षा, मात्सरता, राग, द्वेष, ह्यांचे वेग धारण केले पाहिजे. (संदर्भ-अ.हृ. सु.-४/२५) सोशल मिडिया वापरतांना सुद्धा आयुर्वेदाच्या ह्या सूत्राचे भान आपण ठेवायला हवा.  समोरच्याला (मुद्दाम) त्रास देणाऱ्या कमेंटचा वेग धारण केला, फोटो बघून निरर्थक हेवे-दावे, इर्षा, लोभ  मनात येत असतील तर त्यांना थांबविण्याचा आवर्जून प्रयत्न केला तर  नक्क्कीच मानसस्वास्थ्य आपले आणि समोरच्याचे सुद्धा चागले राहील असा विश्वास आहे.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7a

No comments:

Post a Comment

Visit Our Page