Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, February 19, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*बुद्धीबळ*

बुद्धीबळ किंवा चेस नावाचा खेळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ह्या खेळात बुद्धीच्या जोरावर समोरच्याला हरविणे अपेक्षित असते. आपल्या बुद्धी चातुर्याने समोरच्या राजाची कोंडी करायची असते आणि सामना जिंकायचा असतो. असा हा रंजक खेळ खेळण सगळ्यांनाच काही जमत नाही. ज्याची बुद्धी तल्लख तोच ह्यात जिंकू शकतो.

आपल्या आजूबाजूच्या समाजात २ प्रकारच्या लोकांचे वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक बौद्धिक श्रम करणारे आणि दुसरा वर्ग आहे शारीरिक श्रम करणारा. नोकरदार आणि  व्यापारी वर्ग हा बौद्धिक श्रम करणारा तर मजदूर वर्ग हा शारीरिक श्रम करणारा आहे. एका कडे बुद्धी आहे व एका कडे बळ आहे म्हणून दोगेही एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु दोघेही परीपूर्ण नाहीत.

श्री. समर्थ रामदास स्वामी मात्र ह्याला अपवाद. समर्थ जेव्हडे बुद्धिवान होते तेव्हडेच बलवानहि होते. समर्थ रामदासस्वामी हे बलोपासक होते. हि बलोपासना स्वतः पुरता मर्यादित न ठेवता रामदासांनी सामान्य लोकांपर्यंत पोचवली. बल-बुद्धीचे प्रतिक म्हणजे भगवान मारुती. त्यांनी मारुतीची मंदिरे संपूर्ण देशभरात विविध प्रांतात उभारली आणि लोकांना बलोपासना शिकविली. सोबतच मन बुद्धी स्थिरतेसाठी मनाचे श्लोक समर्थांनी सामान्यांना दिले. ज्याप्रमाणे समर्थांकडे बल आणि बुद्धीचा मेळ होता तसाच बल-बुद्धीचा मेळ छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा होता. युद्धकौशल्या सोबतच गनिमी कावा सुद्धा त्यांच्याकडे होता. त्याच जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली.

काल शिव जयंती झाली आज श्रीरामदास नवमी आहे. काल छत्रपती शिवाजींचा जन्म झाला होता आणि आज समर्थ रामदासांनी सज्जन गडावर देह ठेवला होता. दोघेही जगाचे मार्गदर्शक  आहेत. लोकांच्या हृदयात दोगेही अमर झाले आहेत आणि दोघेही परिपूर्ण आहेत.  म्हणून फक्त बौद्धिक श्रम आणि फक्त शारीरिक श्रम मनुष्याला पूर्णत्व देत नाही त्यासाठी दोघांची सांगड असवी लागते.  जे शारीरक श्रम करीत नाहीत त्यांना स्थौल्य, बिपी, डायबेटीस, मानसिक ताणताणाव असे आजरा होत आहेत. म्हणून डॉक्टर कडे गेल्यावर त्यांना पाहिला सल्ला शारीरक श्रम करण्याचा मिळतो. म्हणून स्वतःचे आणि समजाचे स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शारीरिक बळ आणि बुद्द्धी दोन्ही मिळवावे लागतील.

चला तर बलबुद्धीचे उपासक होऊया, बुद्धी आणि बळ वाढवूया, समाज घडवूया.

*जय जय रघुवीर समर्थ*

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-7A

No comments:

Post a Comment

Visit Our Page