Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, March 2, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*वाद-प्रतिवाद आणि आयुर्वेद*

विविध प्रसिद्धी माध्यमे, इलेक्ट्रोनिक मिडिया, सोशल मिडिया ह्यावरून आपल्याला सतत कुठल्यान कुठल्या विषयावरून वाद सुरु असलेले दिसतात. एकमेकांवर ओरडणे, किंचाळणे पासून तर थेट श्रीमुखावर हाताचा ठसा उमटवे पर्यंत हि चर्चा विकोपाला गेलेली असते. बघणारा श्रोता आणि सोशल मिडिया वरील वाचक सुद्धा आता ह्या प्रकाराला कंटाळत चालला आहे. ह्यामुळे संवेदनशील आणि महत्वाच्या विषयाचे गांभीर्य कमी होत जाताना दिसते आहे. वाद-प्रतिवाद(डिबेट) नक्कीच झाला पाहिजे. परंतु ह्याची काही पद्धती असली पाहिजे व काही नियम असले पाहिजे. आयुर्वेदने वैद्यांना वाद-प्रतिवाद करण्याचे काही नियम सांगितले आहेत. मला वाटते ते नियम सर्व क्षेत्रातील विद्वानांनी नक्कीच फॉलो करायला हवे.

*आयुर्वेद काय म्हणते?*

आयुर्वेदाने डिबेटलाच संभाषा म्हंटले आहे. दोन विद्वानांनी/पक्षांनी केलेल्या संभाषेतून ज्ञानप्राप्ती होते, संदेह, शंका दूर होत असतात. संभाषा कोणासोबत करावी, करू नये. एकमेकांचे गुणदोष ओळखून वाद-प्रतिवाद कसा करावा? संभाषेचे प्रकार इत्यादी विस्तृत माहिती आयुर्वेदाने चरक संहितेत वर्णन केली आहे.

आयुर्वेदाने संधाय संभाषा व विगृह्य संभाषा असे दोन प्रकार वर्णन केले आहेत. संधाय संभाषा म्हणजे जी चर्चा मित्रता ह्या भावाने होते. वादी-प्रतिवादी हे क्रोधरहित, समोरच्याचा आदर ठेऊन चर्चा करणारे, सहनशीलता असणारे, भाषेत आदर व गोडवा असणारे असतात. ह्या चर्चेतून निश्चित निर्णय/ज्ञान मिळत असतो. तर विगृह्य प्रकारात एक दुसऱ्याचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वपक्षाचा दृष्टीकोन लक्षात न घेता विपरीत अर्थ घेऊन मेरे मुर्गी कि एकीच टांग हा attitude ठेवून समोरच्याला हरविण्याचा प्रयत्न असतो. साहजिकच हि चर्चा निष्फळ ठरते. संधाय संभाषा हि संवाद घडविते तर विगृह्य केवळ वितंडवाद घडविते.

आजकाल आपण बघतो संवाद न होता वादच जास्त होतात. कशी चर्चा करावी ह्यापेक्षा कसे भांडावे हेच जास्त शिकायला मिळते. चर्चेतून ज्ञान मिळत नाही आणि शंकाहि दूर होत नाहीत. फक्त मीच खरा. बाकी सब पानी कम हेच जास्त बघयला मिळते. मला वाटते ज्यातून आपल ज्ञान वाढेल, बोलण्याच कौशल्य वाढेल, शंका दूर होतील अश्याच चर्चा आपण बघाव्या किंवा वाचाव्यात आणि चर्चा करतांनाहि नियमांचे भान ठेवून करावी जेणेकरून आपल्या श्रोत्यांचा अपेक्षाभंग होणार नाही. (संदर्भ- च.वि. ८/१५,१६)

(सूचना- ह्या ठिकाणी सविस्तर संभाषा विधी वर्णन केलेला नाही. चरक संहितेत वर्णन केला आहे. जिज्ञासूंनी संहितेतून जरूर जाणून घ्यावे.)

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7E

No comments:

Post a Comment

Visit Our Page